शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी तहसीलसमोर जागरण गाेंधळ

By हरी मोकाशे | Updated: January 29, 2024 19:04 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रेणापुरात आंदोलन

रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान, पीकविमा द्यावा, दुष्काळ सवलती लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

शेतकरी क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष सचिन दाने यांच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन करीत शासनास साकडे घालण्यात आले. अल्प पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खरीपातील सोयाबीनच्या नुकसानीपोटी आग्रीम देण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळ वगळता अन्य चार मंडळास आग्रीम मिळाला नाही. तसेच राज्य शासनाने रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करीत अध्यादेश काढला. पण, अद्यापही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. रब्बीतील हरभरा पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शासन अध्यादेश असताना बँक, पीकविमा कंपनी, महावितरण व प्रशासन त्याची अमलबजावणी करीत नाही.

तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी १५ हजार दुष्काळी अनुदान द्यावे. शेतीशी निगडित कर्जमाफ करावे. तालुक्यातील पाचही मंडळातील वंचित शेतकऱ्यांना आग्रीमसह शंभर टक्के पीकविमा तात्काळ द्यावा. सक्तीची कर्ज वसुली बंद करावी. सक्तीची वसुली करणाऱ्या बँकेवर कारवाई करावी. तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली थांबावी. शेतकऱ्यांच्या मुला- मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शासकीय कागदपत्रे आठवडाभरात मिळावित. रेणापूर तहसीलमध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे स्वतंत्र स्वच्छतागृह बांधावे अशा मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर