शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

‘मांजरा’ धरणावरील वीस पाणीपुरवठा योजनांकडे पाटबंधारे विभागाची ४७ कोटींची थकबाकी !

By हणमंत गायकवाड | Updated: January 31, 2024 13:32 IST

तत्काळ थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधितांना दिला आहे.

लातूर : मांजरा धरणातूनलातूर शहरासह अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर, लोहटा, भालगाव, वडगाव, युसूफ वडगाव, माळेगाव, धनेगाव, आवाड शिरपुरा, शिराढोण, सारणी, साळेगाव, करंजकल्ला, दाभा, हिंगणगाव आणि चिंचोली माळी आदी वीस पाणीपुरवठा योजना आहेत. या सर्वांकडे मिळून पाणीपुरवठ्याची ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे. तत्काळ थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधितांना दिला आहे.

मांजरा प्रकल्पातून या वीस योजनांसाठी दररोज ७२ हजार ५८० घनमीटर पाण्याची उचल केली जाते. यापैकी लातूर शहरासह ६० हजार घनमीटर पाण्याची उचल दिवसाला केली जाते. या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला २.२५ द.ल.घ.मी. पाणी लागते. नित्यनेमाने पाण्याची उचल केली जात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नित्यनेमाने पाणीपट्टी भरली जात नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे. लातूर महापालिकेकडे २६ कोटी ४५ लाख ६१ हजार ५४६ रुपयांची थकबाकी आहे तर लातूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे २ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४५ रुपयांची थकबाकी आहे.

या योजनांकडे अशी आहे थकबाकी...योजना थकबाकीलातूर मनपा २६,४५६,१५४६मजिप्रा. लातूर २८१,५९,८४५न.प. अंबाजोगाई ५०,०७१,५०३न.प. कळंब १६,९४,७४०केज-धारूर बारा गावे ४४,३२,९८२म.औ.वि.म. लातूर १२,५५,७६९३२ग्रा.पं. लोहटा ९३,४४९७ग्रा.पं. भालगाव ३८,९३८ग्रा.पं. युसुफ वडगाव २५,५५,३६ग्रा.पं. माळेगाव ३२,४२२ग्रा.पं. धनेगाव ४७,८१९ग्रा.प. आवाड शिरपुरा १०,९०,४५सारणी ३३,९,१०७ग्रा.पं. साळेगाव १०,५७,६८ग्रा.पं. करंज कल्ला ११,३९,१३ग्रा.पं. दाभा ४०,२१०ग्रा.पं. हिंगणगाव ५०,२२६चिंचोली माळी ५० गावे योजना ८८,९५७धरणातील पाण्याची स्थिती...मांजरा धरणात सद्य:स्थितीत १६.०१ पाणीसाठा आहे.मृतसाठा ४७.१३० द.ल.घ.मी.

जिवंत पाणीसाठा २८.३३४ द.ल.घ.मी.२० पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. त्यातील केज, धारूर पाणीपुरवठा योजनेवर बारा गावांसाठी योजना आहे, तर चिंचोली माळी या योजनेवर १५ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. यंदा धरण क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे प्रकल्प भरलेला नाही. त्यामुळे सिंचनाचे पाणी बंद आहे. फक्त पिण्यासाठी राखीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.मांजरा धरणात सद्य:स्थितीत २८.३२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा योजनांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याची थकबाकी तत्काळ भरून जलसंपदा विभागाला सहकार्य करावे. संबंधित एजन्सीने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद केला जाईल. संबंधित संस्थांना या अनुषंगाने कळविण्यात आले आहे. सर्व योजनांकडे मिळून ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे.- सूरज निकम, शाखाधिकारी

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणWaterपाणी