शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

बीदरच्या आरक्षित कोट्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय; जागा मिळत नसल्याने ओरड  

By आशपाक पठाण | Updated: January 20, 2024 19:08 IST

लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला.

लातूर: लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला. आठवड्यातील तीन दिवस ही रेल्वे बीदरपर्यंत जात असल्याने लातूरच्या प्रवाशांना जागा मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली. रेल्वेच्या विस्ताराबरोबरच दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीत आरक्षित ८६५ जागांपैकी ७८० जागांचा रिमोट कोटा बीदरला अन् लातूरसाठी केवळ ८५ जागा आरक्षित ठेवल्या. यातून प्रवाशांची कोंडी होत आहे.

लातूरकरांची मदर ट्रेन असलेली लातूर ते मुंबई रेल्वे सुरळीतपणे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही २५ एप्रिल २०१७ मध्ये ही गाडी बीदरपर्यंत नेण्यात आली. तेव्हापासून या गाडीत लातूरकरांना जागा मिळणे कठीण झाले आहे. आरक्षित रिमोट कोटा लातूरला देणे अपेक्षित असताना दक्षिण मध्य रेल्वेने बीदरला कोटा वाढवून तेथील प्रवाशांची सोय केली. इथे मात्र, लातूर, धाराशिव, बार्शीच्या प्रवाशांना जागाच मिळत नसल्याने इतर वाहनांचा आधार घेण्याची वेळ आली. बीदरचा रिमोट कोटा जनरल केल्यावर प्रवाशांची सोय होणार आहे, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जनरल कोट्यामुळे बीदर ते पुण्यापर्यंतच्या प्रवाशांना प्रथम बुकींग करणाऱ्यास सहजपणे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मुंबई ते बीदर स्वतंत्र रेल्वे हवी...लातूर ते मुंबई ही रेल्वे पूर्ववत करून सात दिवस लातुरातून सोडणे आवश्यक आहे. विस्तारित बीदर मार्गावर स्वतंत्रपणे नवीन गाडी सुरू केल्यास प्रवाशांची साेय होणार आहे. मागील सहा वर्षांपासून लातूरच्या प्रवाशांची परवड होत आहे. जागाच मिळत नसल्याने अनेकजण त्रस्त आहेत. मध्य रेल्वेने बीदर ते मुंबई रेल्वेला ज्याप्रमाणे तीनही दिवस जनरल कोटा केला आहे त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेने जनरल कोटा केल्यास सोय हाेणार आहे. - शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती.

प्रथम बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य...बिदरचा जो ७८० जागांचा आरक्षित रिमोट कोटा आहे तो जनरल कोट्यात रूपांतरीत केल्यास बीदरपासून बार्शीपर्यंत कुणालाही सहजपणे तिकिट मिळेल. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने कोटा बदलासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे