शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बीदरच्या आरक्षित कोट्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय; जागा मिळत नसल्याने ओरड  

By आशपाक पठाण | Updated: January 20, 2024 19:08 IST

लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला.

लातूर: लातूर ते मुंबई रेल्वेचा २०१७ मध्ये बीदरपर्यंत विस्तार झाला. आठवड्यातील तीन दिवस ही रेल्वे बीदरपर्यंत जात असल्याने लातूरच्या प्रवाशांना जागा मिळत नसल्याची ओरड निर्माण झाली. रेल्वेच्या विस्ताराबरोबरच दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीत आरक्षित ८६५ जागांपैकी ७८० जागांचा रिमोट कोटा बीदरला अन् लातूरसाठी केवळ ८५ जागा आरक्षित ठेवल्या. यातून प्रवाशांची कोंडी होत आहे.

लातूरकरांची मदर ट्रेन असलेली लातूर ते मुंबई रेल्वे सुरळीतपणे प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असतानाही २५ एप्रिल २०१७ मध्ये ही गाडी बीदरपर्यंत नेण्यात आली. तेव्हापासून या गाडीत लातूरकरांना जागा मिळणे कठीण झाले आहे. आरक्षित रिमोट कोटा लातूरला देणे अपेक्षित असताना दक्षिण मध्य रेल्वेने बीदरला कोटा वाढवून तेथील प्रवाशांची सोय केली. इथे मात्र, लातूर, धाराशिव, बार्शीच्या प्रवाशांना जागाच मिळत नसल्याने इतर वाहनांचा आधार घेण्याची वेळ आली. बीदरचा रिमोट कोटा जनरल केल्यावर प्रवाशांची सोय होणार आहे, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जनरल कोट्यामुळे बीदर ते पुण्यापर्यंतच्या प्रवाशांना प्रथम बुकींग करणाऱ्यास सहजपणे जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

मुंबई ते बीदर स्वतंत्र रेल्वे हवी...लातूर ते मुंबई ही रेल्वे पूर्ववत करून सात दिवस लातुरातून सोडणे आवश्यक आहे. विस्तारित बीदर मार्गावर स्वतंत्रपणे नवीन गाडी सुरू केल्यास प्रवाशांची साेय होणार आहे. मागील सहा वर्षांपासून लातूरच्या प्रवाशांची परवड होत आहे. जागाच मिळत नसल्याने अनेकजण त्रस्त आहेत. मध्य रेल्वेने बीदर ते मुंबई रेल्वेला ज्याप्रमाणे तीनही दिवस जनरल कोटा केला आहे त्याप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेने जनरल कोटा केल्यास सोय हाेणार आहे. - शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती.

प्रथम बुकिंग करणाऱ्यांना प्राधान्य...बिदरचा जो ७८० जागांचा आरक्षित रिमोट कोटा आहे तो जनरल कोट्यात रूपांतरीत केल्यास बीदरपासून बार्शीपर्यंत कुणालाही सहजपणे तिकिट मिळेल. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेने कोटा बदलासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

टॅग्स :laturलातूरrailwayरेल्वे