शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

मिरचीला महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

लातूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची, मसाल्याच्या दरांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. गावरान तिखट मिरची २०० रुपयांवर बेडगी ...

लातूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची, मसाल्याच्या दरांमध्ये २० टक्के वाढ झाली आहे. गावरान तिखट मिरची २०० रुपयांवर बेडगी अस्सल मिरची ३५० किलोंवर पोहोचली आहे. जिरे, धने, तीळ, खसखस, खोबर, मेथी, हळद, मोहरी, आदी मसाल्याचे पदार्थही महागले आहेत. या महागाईबाबत गृहिणींनी खेद व्यक्त केला आहे.

उन्हाळ्याच्या प्रारंभी मिरची व मसाल्याच्या पदार्थांची विक्री करून तिखट, मसाले तसेच लोणच्यासाठी लागणारा मसाला गृहिणी तयार करून ठेवतात. त्याची खरेदी उन्हाळ्याच्या प्रारंभीच केली जाते. मात्र यंदा उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरचीसह मसाल्याच्या पदार्थांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणींनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा कमी मसाला, तिखट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तिखट मसाल्याच्या पदार्थांमध्येही काटकसर करण्याची वेळ यावर्षी महागाईमुळे गृहिणींवर येऊन ठेपली आहे.

वर्षभरासाठी लागणारे लाल तिखट, काळी मिरची, मसाला तयार करून ठेवला जातो. आंबा, लिंबाचा खार घालण्यासाठीही मसाला तयार करून ठेवला जातो. परंतु, यंदा मिरची व मसाला महागला आहे. कांडपाचाही दर वाढला आहे. गतवर्षी एका किलोसाठी कांडपाला ३५ रुपये लागत होते. यंंदा ४५ रुपये लागत आहेत.

- फरजाना शेख, गृहिणी,लातूर

मिरचीचा दर २०० ते ३५० रुपयांपर्यंत गेला आहे. मसालाही महागला आहे. एका किलोसाठी ४०० ते ५०० रुपये खर्च येतो. वर्षभराचे लाल तिखट, लाल मसाला, काळे तिखट करून ठेवायचे झाल्यास १५०० रुपये खर्च येतो. ही महागाई कंबरडे मोडणारी आहे. वार्षिक किचनचे बजेट कोलमडले आहे.

- मीराबाई शेंडगे, गृहिणी