शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

संततधार पावसामुळे उदगिरातील १४ प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील ...

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. देवर्जन व तिरू मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ६९ टक्के व ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे यंदा खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही बहरली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात जवळपास २५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. दरम्यान, मागील महिन्यापासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील १४ प्रकल्पांत चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

तालुक्यातील देवर्जन व तिरू दोन मध्यम प्रकल्प, करखेली, बामाचीवाडी, गुडसूर व डाऊळ हिप्परगा हे चार साठवण तलाव तर केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी व चांदेगाव हे लघु प्रकल्प आहेत. देवर्जनमध्ये ६९ टक्के तर तिरू मध्यम प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गुडसूर, डाऊळ हिप्परगा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. करखेली १२.१८ टक्के तर बामाचीवाडी साठवण प्रकल्पात १०.७९ टक्के पाणी उपलब्ध आहे. केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी, चांदेगाव आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. आणखीन पावसाळा शिल्लक असल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा असून एक- दोन पावसांतच तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतील, अशी अपेक्षा आहे.

बनशेळकी तलाव भरला...

उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहराला भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज बागबंदे व पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले यांनी दिली.

पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही...

यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही. तसेच शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकांसाठीही फायदा होईल, असे वाढवणा लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.