शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे उदगिरातील १४ प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील ...

उदगीर : गत महिन्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एकूण १४ मध्यम, साठवण व लघु प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बहुतांश लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. देवर्जन व तिरू मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ६९ टक्के व ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मृगाच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे यंदा खरिपाच्या वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. पिकेही बहरली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात जवळपास २५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. दरम्यान, मागील महिन्यापासून सतत पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यातील १४ प्रकल्पांत चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

तालुक्यातील देवर्जन व तिरू दोन मध्यम प्रकल्प, करखेली, बामाचीवाडी, गुडसूर व डाऊळ हिप्परगा हे चार साठवण तलाव तर केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी व चांदेगाव हे लघु प्रकल्प आहेत. देवर्जनमध्ये ६९ टक्के तर तिरू मध्यम प्रकल्पात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गुडसूर, डाऊळ हिप्परगा साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. करखेली १२.१८ टक्के तर बामाचीवाडी साठवण प्रकल्पात १०.७९ टक्के पाणी उपलब्ध आहे. केसगीरवाडी, पिंपरी, नागलगाव, गुरदाळ, कल्लूर, एकुर्का रोड, निडेबन, कोदळी, चांदेगाव आदी ९ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या रबी हंगामासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. आणखीन पावसाळा शिल्लक असल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा असून एक- दोन पावसांतच तालुक्यातील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतील, अशी अपेक्षा आहे.

बनशेळकी तलाव भरला...

उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शहराला भविष्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. सुरळीत पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती नगराध्यक्ष बसवराज बागबंदे व पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले यांनी दिली.

पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही...

यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणवणार नाही. तसेच शेतकऱ्यांना रबी हंगामात पिकांसाठीही फायदा होईल, असे वाढवणा लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता नईम मोमीन यांनी सांगितले.