शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यातील बहुतांश गावांची तहान भागवणारा व पिकांसाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५.३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यात पाण्याचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. दररोज ४ एमएमने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, तीन महिन्यांत जवळपास ९.५० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. वर्षभरापूर्वी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. अर्ध्या तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १५.३५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्प पावसाळ्यात भरत नाही. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परंतु, यंदा पावसाळ्यातही नाही आणि परतीच्या पावसातही प्रकल्पात एक थेंबही जलसाठा झालेला नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रेणात जलसाठा झालाच नाही. त्यामुळे तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेसच्या पात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने या तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत.

प्रकल्पात ४.२८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...उपयुक्त पाणीसाठा ४.२८५ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१५६ दलघमी असून, पाण्याची टक्केवारी १५.३५ टक्के आहे. तीन महिन्यांत ९.५० टक्के जलसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्केवारी होती. तीन महिन्यांत जवळपास साडेनऊ टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पात १५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीपुरवठा योजना आहेत त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन होत आहे. धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी बंदची कार्यवाही करण्यात आली असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पाणी नाहीच...रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रेणा धरण निर्मितीसाठी जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, कामखेडा, घनसरगाव, रेणापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यावर विविध पिकांची लागवड केली. मात्र, आता हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी