शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यातील बहुतांश गावांची तहान भागवणारा व पिकांसाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५.३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यात पाण्याचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. दररोज ४ एमएमने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, तीन महिन्यांत जवळपास ९.५० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. वर्षभरापूर्वी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. अर्ध्या तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १५.३५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्प पावसाळ्यात भरत नाही. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परंतु, यंदा पावसाळ्यातही नाही आणि परतीच्या पावसातही प्रकल्पात एक थेंबही जलसाठा झालेला नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रेणात जलसाठा झालाच नाही. त्यामुळे तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेसच्या पात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने या तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत.

प्रकल्पात ४.२८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...उपयुक्त पाणीसाठा ४.२८५ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१५६ दलघमी असून, पाण्याची टक्केवारी १५.३५ टक्के आहे. तीन महिन्यांत ९.५० टक्के जलसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्केवारी होती. तीन महिन्यांत जवळपास साडेनऊ टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पात १५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीपुरवठा योजना आहेत त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन होत आहे. धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी बंदची कार्यवाही करण्यात आली असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पाणी नाहीच...रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रेणा धरण निर्मितीसाठी जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, कामखेडा, घनसरगाव, रेणापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यावर विविध पिकांची लागवड केली. मात्र, आता हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी