शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यातील बहुतांश गावांची तहान भागवणारा व पिकांसाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५.३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यात पाण्याचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. दररोज ४ एमएमने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, तीन महिन्यांत जवळपास ९.५० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. वर्षभरापूर्वी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. अर्ध्या तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १५.३५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्प पावसाळ्यात भरत नाही. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परंतु, यंदा पावसाळ्यातही नाही आणि परतीच्या पावसातही प्रकल्पात एक थेंबही जलसाठा झालेला नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रेणात जलसाठा झालाच नाही. त्यामुळे तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेसच्या पात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने या तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत.

प्रकल्पात ४.२८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...उपयुक्त पाणीसाठा ४.२८५ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१५६ दलघमी असून, पाण्याची टक्केवारी १५.३५ टक्के आहे. तीन महिन्यांत ९.५० टक्के जलसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्केवारी होती. तीन महिन्यांत जवळपास साडेनऊ टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पात १५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीपुरवठा योजना आहेत त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन होत आहे. धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी बंदची कार्यवाही करण्यात आली असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पाणी नाहीच...रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रेणा धरण निर्मितीसाठी जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, कामखेडा, घनसरगाव, रेणापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यावर विविध पिकांची लागवड केली. मात्र, आता हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी