शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिंता वाढली; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा !

By संदीप शिंदे | Updated: January 17, 2024 15:37 IST

रेणापूर तालुक्यावर टंचाईचे संकट, दररोज ४ एमएमने पाण्याचे होते बाष्पीभवन

रेणापूर : तालुक्यातील बहुतांश गावांची तहान भागवणारा व पिकांसाठी वरदान ठरलेल्या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात केवळ १५.३५ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यात पाण्याचे संकट उभे टाकण्याची शक्यता आहे. दररोज ४ एमएमने पाण्याचे बाष्पीभवन होत असून, तीन महिन्यांत जवळपास ९.५० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सहन कराव्या लागू शकतात.

रेणापूर तालुक्यात व्हटी व रेणा मध्यम हे दोन प्रकल्प मोठे आहेत. रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर शहरासह दहा खेडी, पानगाव बारा खेडी, कामखेडा पाच खेडी, पट्टीवडगाव, खरोळा या गावांच्या नळयोजना अवलंबून आहेत. वर्षभरापूर्वी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी रेणापूर तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही. मोठा पाऊस न झाल्याने व परतीचाही पाऊस न झाल्याने आजही नदी, नाले, ओढे कोरडेच आहेत. अर्ध्या तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा दमदार पाऊस न झाल्याने कसलाही पाणीसाठा झाला नाही. सध्या रेणा प्रकल्पात १५.३५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून नागरिकांतून पुढील काळात पाण्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिला तर रेणा प्रकल्प पावसाळ्यात भरत नाही. त्यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. परंतु, यंदा पावसाळ्यातही नाही आणि परतीच्या पावसातही प्रकल्पात एक थेंबही जलसाठा झालेला नाही. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने रेणात जलसाठा झालाच नाही. त्यामुळे तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, रेणा मध्यम प्रकल्पाखाली असलेल्या रेणा नदीवर घनसरगाव, रेणापूर, खरोळा बॅरेजेसच्या पात्रात पाणी नसल्याने व रेणा प्रकल्पातून पाणी न सोडल्याने या तिन्ही बॅरेजेस कोरडे पडत आहेत.

प्रकल्पात ४.२८५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा...उपयुक्त पाणीसाठा ४.२८५ दलघमी, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी, एकूण पाणीसाठा ३.१५६ दलघमी असून, पाण्याची टक्केवारी १५.३५ टक्के आहे. तीन महिन्यांत ९.५० टक्के जलसाठा कमी झाला असून, ऑक्टोबर महिन्यामध्ये २४.८५ टक्केवारी होती. तीन महिन्यांत जवळपास साडेनऊ टक्के जलसाठ्यात घट झाली आहे. सध्या मध्यम प्रकल्पात १५.३५ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पाणीपुरवठा योजना आहेत त्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणीटंचाई टाळावी, असे आवाहन होत आहे. धरण क्षेत्रातील सर्व विद्युत मोटारी बंदची कार्यवाही करण्यात आली असल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पाणी नाहीच...रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रेणा धरण निर्मितीसाठी जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय होईल म्हणून आपल्या जमिनी दिल्या. मात्र, यंदा पावसाच्या कमतरतेमुळे धरणात पाणीसाठा झाला नाही. पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, कामखेडा, घनसरगाव, रेणापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पाण्यावर विविध पिकांची लागवड केली. मात्र, आता हे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शेतीसाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पावर अवलंबून असलेले शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी