शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

रेल्वे थांबत नसल्याने संजीवनी बेटावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

वडवळ नागनाथ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने यात्रा भरली आहे. ...

वडवळ नागनाथ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर १३ सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झाल्याने यात्रा भरली आहे. यात्रेसाठी राज्यासह इतर राज्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र, रेल्वेचा सोपा मार्ग असून, केवळ रेल्वे वडवळ नागनाथ स्थानकावर थांबत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.

हैद्राबाद-परळी वैजनाथ या ब्राॅडगेज लाईनवर असलेले निजामकालीन वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशनवर कोणत्याच सुविधा नाहीत. स्टेशन मास्तरअभावी पार्सलची सुविधा नाही. काही वर्षांपूर्वी या स्थानकावरून भाजीापाल्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे परंतु, पुरेसे कर्मचारी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने संजीवनी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे थांबविण्यास परवानगी द्यावी, प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी, निवारा, एटीएम मशीन आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

सर्वदूर परिचित असलेले संजवनी वनस्पती बेट व नऊ नाथांपैकी एक नाथ नागनाथ महाराजांचे मंदिर वडवळ येथे असून, टॉमेटो व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. लातूर रोड, चाकूर, उदगीर येथे काॅलेज व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थांची संख्याही अधिक असल्याने रेल्वे साेयीची ठरते. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे थांबविण्याची मागणी होत आहे.

पंधरा दिवस पर्यटकांची असते ये-जा...

सध्या उत्तरा नक्षत्र सुरू झाले असून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील संजीवनी बेटावर पर्यटकांबरोबरच, वैद्य, हकीम यांची पंधरा दिवस रेलचेल असते. मात्र, हैद्राबाद-औरंगाबाद ही पॅसेंजर गाडी कोरोनाकाळापासून रेल्वे प्रशासनाने येथे थांबा बंद केला आहे. थांबा लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

स्थानकावरून धावतात या गाड्या...

वडवळ नागनाथ स्थानकावर हैद्राबाद-औरंगाबाद, हैद्राबाद-पूर्णा, निजामाबाद-पंढरपूर, परळी-मिरज या पॅसेंजर गाड्या थांबत होत्या. औरंगाबाद-बंगलोर, शिर्डी-काकीनाडा, नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस गाड्याही धावतात. मात्र, या थांबत नसल्याने गैरसोय होत आहे. खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मदतीने लक्ष दिल्यास स्थानकाचा विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.