शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

कोरोनाच्या धास्तीने नागरिक शेतात, वीजपुरठा खंडितमुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST

रेणापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या ...

रेणापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या एक हजाराच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही जणांनी गाव सोडून आपल्या शेतातील जागलीवर जाऊन राहत आहे. तालुक्यातील ब्रह्मवाडी, गव्हाण, दर्जी बोरगाव या भागातील नागरिकांचे शेतामध्ये जाऊन राहण्याचे प्रमाण जास्त आहे.

शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातच रहावे लागत आहे. त्यामुळे अंधारात रात्र काढावी लागत आहे. शेतात थ्री फेज वीजपुरवठा असतो. परंतु, भारनियमनामुळे व रात्री-अपरात्री सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ब्रह्मवाडी येथील शेतकरी व नागरिकांनी महावितरणचे उपविभागीय कार्यकारी अभियंता व या भागातील शाखा अभियंत्यास २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवावे, अशी मागणी केली. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागणीला कसलाही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

२४ तास वीजपुरवठा ठेवावा...

कोरोनाच्या भीतीने या भागातील नागरिक शेतात जाऊन राहत आहेत. मात्र, वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यासाठी चार दिवसांपूर्वी महावितरणचे अभियंता यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे ब्रह्मवाडीचे शेतकरी भागवत माने यांनी सांगितले.