शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मानसिक आजारातून मुक्त मातेस ६ वर्षांनी आठवली मुलगी अन् घर; अखेर चिमुकलीची झाली भेट

By संदीप शिंदे | Updated: May 27, 2023 20:14 IST

चिमुकली २२ दिवसांची असताना आईस मानसिक आजार जडला, अखेर मातृछत्र सहा वर्षांनी भेटले

लातूर : मानसिक आजारामुळे घरापासून दुरावलेल्या एका महिलेला सहा वर्षांनंतर बरे झाल्यावर आपल्याला लहान मुलगी होती हे पहिल्यांदा आठवले. तिच्यातील मातृत्वाने आजारावर विजय मिळवित मुलगी, कुटुंबीय, घर-गावही ध्यानी आले. मुलगी २२ दिवसांची असताना बाहेर पडलेली आई सहा वर्षांनी कन्येसमोर आली अन् तिला मातृछत्र मिळाले.

जानेवारी २०२३ मध्ये लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातून सहायक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी रिलिजन टू रिस्पॉन्सिबिलिटी फाउंडेशनचे राहुल पाटील यांना संपर्क करून मानसिक आजारी स्थितीत असलेल्या महिलेची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महिलेला बुलढाणा येथील अशोक काकडे यांच्या दिव्य सेवा प्रकल्पात पाठविले. तिथे तिच्यावर विनामूल्य उपचार झाले. ती बरी झाली. त्यानंतर तिने स्वत:चे नाव सुरेखा सांगितले. तिला लहान मुलगी असल्याचे आठवले. मूळची नांदेड येथील व सासर पंढरपूर असल्याचे तिने सांगितले. अशोक काकडे यांनी उपचारानंतर सुरेखा यांना घरी पोहोचविण्यासाठी लातूरच्या आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील, आकाश गायकवाड, आसिफ पठाण, मुस्तफा सय्यद, गोपाल ओझा यांच्याशी संवाद साधला. तेथून कुटुंबीयांचा शोध घेऊन कार्यकर्त्यांनी महिलेला घरापर्यंत पोहोचविले.

आई म्हणत...घट्ट मिठी मारली...२२ दिवसांची चिमुकली असताना आईचे घर सुटले. ती कुठे आहे, ती आता कशी दिसत असेल याची कसलीही कल्पना नाही. सहा वर्षांनंतर तिला कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबीयांनी जेव्हा सांगितले ही तुझी आई तेव्हा तिने आई म्हणत...घट्ट मिठी मारली. तत्पूर्वी लातूर येथे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरेखा व त्यांच्या परिवाराची विचारपूस केली.

स्वच्छ भारत मिशन...कचरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन आहे. त्यात स्वत:चे भान हरवलेल्या अन् कचरा कुंडीसारख्या अस्वच्छ ठिकाणी निपचित पडलेल्या मनोरुग्णांना आधार देण्यासाठी, अशा रुग्णांना स्वच्छ भारत मिशनमध्ये मदत करावी, अशी मागणी आरटीआर फाउंडेशनचे राहुल पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFamilyपरिवार