शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

लग्नाला निघालेल्या भरधाव व्हॅन आणि दुचाकीचा भीषण अपघात, ३ गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: June 11, 2023 20:09 IST

जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा येथील घटना

लातूर - नांदेड जिल्ह्यातील कंधारकडे लग्नाला निघालेल्या व्हॅनचा आणि रावणकाेळा येथून उदगीरला निघालेल्या दुचाकीचा रविवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, यात एका महिलेसह दाेन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जळकाेट-उदगीर महामार्गावरील पाटाेदा गावानजीकच्या वळणावर झाला. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील हाळी येथून मारुती सुझकी इकाे व्हॅन ही कंधारकडे लग्नासाठी रविवारी सकाळी निघाली हाेती. दरम्यान, जळकाेट तालुक्यातील रावणकाेळा येथून उदगीरच्या दिशेने निघालेली दुचाकी पाटाेदा गावानजीक सकाळी ९:३० वाजता आली असता, भरधाव व्हॅनने (एम.एच. १२ पी.टी. १६८७) दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातामध्ये अर्चना रामकिशन शिंदे (वय ३६ रा. नाडका, ता. कंधार, जि. नांदेड), संदीप बालाजी पांडे (वय २३ रा. रावणकाेळ, ता. जळकाेट जि. लातूर) आणि माेतीराम दिगांबर बिरादार (वय २४ रा. पाटाेदा, ता. जळकाेट, जि. लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, यातील जखमी महिला अर्चना शिंदे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रविवारी सायंकाळी लातूरला हलविण्यात आल्याची माहिती जळकाेट पाेलिसांनी दिली.

अपघातग्रस्त दाेन्ही वाहने पाेलिसांनी घेतली ताब्यात...अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पाेलिस उपनिरीक्षक पी.डी. राठाेड, पाेलिस काॅन्स्टेबल राहुल वडारे, आर.यू. मिटकरी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून दाेन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले. ती वाहने पाेलिसांनी ताब्यात घेतली असून, व्हॅनचालकाचा पाेलिस शाेध घेत आहेत.  

अपघाती वळणावर अनेक घडले अपघात

जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा गावानजीक अपघातप्रवण क्षेत्रात वळणरस्ता आहे. या धाेकादायक अपघाती वळणावर आठवड्यातून किमान एक-दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. वळणावर आल्यानंतर समाेरचे वाहन अचानक दिसते आणि वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटते. गाेंधळलेल्या, नियंत्रण सुटलेल्या परिस्थितीत भीषण अपघाताच्या घटना घडत असून, या अपघाती वळणाने अनेकांचा बळी घेतला आहे.