शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लग्नाला निघालेल्या भरधाव व्हॅन आणि दुचाकीचा भीषण अपघात, ३ गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: June 11, 2023 20:09 IST

जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा येथील घटना

लातूर - नांदेड जिल्ह्यातील कंधारकडे लग्नाला निघालेल्या व्हॅनचा आणि रावणकाेळा येथून उदगीरला निघालेल्या दुचाकीचा रविवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, यात एका महिलेसह दाेन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जळकाेट-उदगीर महामार्गावरील पाटाेदा गावानजीकच्या वळणावर झाला. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील हाळी येथून मारुती सुझकी इकाे व्हॅन ही कंधारकडे लग्नासाठी रविवारी सकाळी निघाली हाेती. दरम्यान, जळकाेट तालुक्यातील रावणकाेळा येथून उदगीरच्या दिशेने निघालेली दुचाकी पाटाेदा गावानजीक सकाळी ९:३० वाजता आली असता, भरधाव व्हॅनने (एम.एच. १२ पी.टी. १६८७) दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातामध्ये अर्चना रामकिशन शिंदे (वय ३६ रा. नाडका, ता. कंधार, जि. नांदेड), संदीप बालाजी पांडे (वय २३ रा. रावणकाेळ, ता. जळकाेट जि. लातूर) आणि माेतीराम दिगांबर बिरादार (वय २४ रा. पाटाेदा, ता. जळकाेट, जि. लातूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उदगीर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, यातील जखमी महिला अर्चना शिंदे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रविवारी सायंकाळी लातूरला हलविण्यात आल्याची माहिती जळकाेट पाेलिसांनी दिली.

अपघातग्रस्त दाेन्ही वाहने पाेलिसांनी घेतली ताब्यात...अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पाेलिस उपनिरीक्षक पी.डी. राठाेड, पाेलिस काॅन्स्टेबल राहुल वडारे, आर.यू. मिटकरी यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून दाेन्ही वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. याबाबत जळकाेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातात दाेन्ही वाहनांचे माेठे नुकसान झाले. ती वाहने पाेलिसांनी ताब्यात घेतली असून, व्हॅनचालकाचा पाेलिस शाेध घेत आहेत.  

अपघाती वळणावर अनेक घडले अपघात

जळकाेट-उदगीर महामार्गावर पाटाेदा गावानजीक अपघातप्रवण क्षेत्रात वळणरस्ता आहे. या धाेकादायक अपघाती वळणावर आठवड्यातून किमान एक-दाेन अपघाताच्या घटना घडत आहेत. वळणावर आल्यानंतर समाेरचे वाहन अचानक दिसते आणि वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटते. गाेंधळलेल्या, नियंत्रण सुटलेल्या परिस्थितीत भीषण अपघाताच्या घटना घडत असून, या अपघाती वळणाने अनेकांचा बळी घेतला आहे.