शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन नियमावलीमुळे लातूरात आरटीईच्या दीड हजार जागा पोहचल्या २८ हजारांवर

By संदीप शिंदे | Updated: April 6, 2024 15:21 IST

सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

लातूर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. यामध्ये मागील वर्षीपर्यंत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत होते. मात्र, आता नवीन नियमानुसार अर्जदार विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलाेमीटर अंतरात असलेल्या खासगी अनुदानित, जिल्हा परिषद शाळांत प्रवेश मिळणार आहे. परिणामी, शाळांची नोंदणी वाढली असून, आतापर्यंत १७३९ शाळांची नोंदणी शिक्षण विभागाकडे झाली आहे. या शाळांमध्ये २८ हजार ५२१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.

जिल्ह्यात मागील वर्षी २०० खासगी शाळांची आरटीईसाठी नोंदणी होती. त्यानुसार १६६९ जागांवर प्रवेश झाले होते. मात्र, आता महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत शाळा, कॅन्टोमेंट बोर्ड शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खासगी अनुदानित, स्वंयअर्थसहायित शाळेतही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा व स्वंयअर्थसहायित शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, मागील वर्षी तीन किलोमीटर अंतरामध्ये असलेल्या शाळांत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होते. सध्या नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आरटीई प्रवेश प्रकियेमध्ये सद्यस्थितीत केवळ शाळांची नोंदणी सुरु आहे. शिक्षण विभागाकडून अर्जप्रक्रिया, निवड यादीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रवेश प्रक्रियेचे संपुर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

कागदपत्रे पडताळणीसाठी समिती गठीत...आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. यामध्ये तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी हे समितीचे अध्यख राहणार असून, केंद्रप्रमुख, शासकीय, विनाअनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी हे सदस्य राहणार आहेत. तर विस्तार शिक्षण अधिकारी हे सदस्य सचिव राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळविले आहे. त्यानुसार समितीचे नियोजन करण्यात येत आहे.

विहीत मुदतीनंतर प्रवेश मिळणार नाही...आरटीईच्या पोर्टलवर अर्ज भरल्यावर आपल्याला निवड झाल्याचा संदेश येईल असा पालकांचा समज असतो. त्यामुळे अनेकजण पोर्टलला भेट देत नाही. त्यामुळे काही वेळेस तांत्रिक अडचण असल्यास संदेश येत नाही. परिणामी, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी. दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे. विहीत मुदतीनंतर प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. याची नोंद घेण्याच्या सुचनाही शिक्षण संचालकांनी केल्या आहेत.

दीड हजार जागा पोहचल्या तीस हजारांवर...मागील वर्षी आरटीई प्रक्रियेसाठी २०० शाळांत १६६९ जागांवर प्रवेश झाले. मात्र, यंदा नवीन नियमावलीमुळे १ हजार ७३९ शाळांतील २८ हजार ५२१ जागांवर प्रवेश होणार आहेत. पूर्वी केवळ खासगी शाळांचा समावेश होता. मात्र, आता शासकीय, अनुदानित शाळांचाही समावेश करण्यात आलेला आहे. परिणामी, शासकीय शाळांतील जागाही आरटीईद्वारे भरल्या जाणार आहेत. सध्या केवळ शाळांची नाेंदणी सुरु असल्याने प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :laturलातूरRight To Educationशिक्षण हक्क कायदा