शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लातूर जिल्ह्यात पावणेदोन लाख मतदार वाढले, संक्षिप्त यादी प्रसिद्ध

By हणमंत गायकवाड | Updated: January 23, 2024 17:27 IST

९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळली

लातूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांची संक्षिप्त यादी प्रसिद्ध केली असून, गत निवडणुकांच्या तुलनेत १ लाख ७१ हजार २५९ मतदार वाढले आहेत. तर वेगवेगळ्या कारणांमुळे ९९ हजार १३९ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. 

सध्या जिल्ह्यात एकूण १९ लाख ४५ हजार ७७१ मतदार असून, त्यापैकी ९ लाख २० हजार ७३६ महिला तर १० लाख २४ हजार ९७५ पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण करण्यात आले असून, १ जानेवारी २०२४ किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी करता येते. २०२४ च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत नोंदणी करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ३ लाख २० हजार ८८ मतदार आहेत. तर शहर मतदारसंघात ३ लाख ७२ हजार १५९, अहमदपूर ३ लाख ३४ हजार ९३६, उदगीर राखीव मतदारसंघात ३ लाख ८ हजार ७७९, निलंगा ३ लाख १९ हजार ५५८ आणि औसा विधानसभा मतदारसंघात २ लाख ९० हजार २५१ मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

जिल्ह्यात विधानसभानिहाय स्त्री-पुरुष मतदारमतदारसंघ पुरुष  स्त्रीलातूर ग्रामीण १६९६१४  १५०४७१लातूर शहर १९३३४९  १७८७८४अहमदपूर  १७७१४२  १५७७९३उदगीर राखीव १६१६०१ १४७१५८निलंगा  १६८६३९  १५०९१२औसा १५४६३०  १३५६१८एकूण १०२४९७५  ९२०७३६

घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी...मागील वर्षी २०२३ च्या अंतिम मतदारयादीमध्ये एकूण १९ लाख १४ हजार ५५८ इतकी मतदारसंख्या होती. त्यानंतर झालेल्या निरंतर प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणे याबाबी सुरू होत्या. २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत मयत, स्थलांतरीत, दुबार मतदार सोडून त्यांची वगळणी दुरुस्ती करण्यात आली.

मतदानाचा टक्का वाढविणार...शहरी आणि ग्रामीण भागात गत निवडणुकीमध्ये ज्या केंद्रावर कमी मतदान झाले होते, त्या केंद्राची यादी तयार करून त्या केंद्रावर मतदार वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय, जिल्ह्यामध्ये जी संवेदनशील मतदार केंद्रे आहेत, त्यांचीही यादी निश्चित करण्यात आली असून, तिथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम लातूर जिल्ह्याला उपलब्ध झाल्या असून, त्यांची तपासणी करून त्या गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कडक पहाराही ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Votingमतदानlaturलातूर