शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

लातूर जिल्ह्यात पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीत औसा तालुका आघाडीवर

By हरी मोकाशे | Published: April 08, 2024 6:02 PM

जिल्हा परिषद : मार्चअखेरपर्यंत ९३.१० टक्के कर वसुली

लातूर : गावच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असला तरी काही आवश्यक मूलभूत सोयी- सुविधांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली महत्त्वाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कर वसुलीवर विशेष लक्ष असते. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मिशन स्वाभिमान मोहिमेमुळे मार्चअखेरीस एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे. ती ९३.१० टक्के आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळते. मात्र, काही नियम, अटी आणि तांत्रिक बाबींमुळे गावातील सर्व भागांचा अपेक्षित विकास साधणे कठीण होते. परिणामी, गावातील नागरिकांत नाराजी निर्माण होण्यास सुरुवात होते. काही वेळेस वादही उद्भवण्याची भीती असते. अशावेळी घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुली अत्यंत उपयुक्त ठरते. त्यातून गावकऱ्यांच्या मागणीनुसार सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची वसुली...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींकडे पाणीपट्टी व घरपट्टीपोटी ६२ कोटी ५६ लाख २४ हजार रुपयांचा कर भरणा होणे अपेक्षित होते. मार्चअखेरपर्यंत पाणीपट्टीपोटी ३५ कोटी ७० लाख तर घरपट्टीपोटी २२ कोटी ५४ लाख ९४ हजारांचा कर वसुली झाली आहे. एकूण ५८ कोटी २४ लाख ९४ हजारांची कर वसुली झाली आहे.

औसा तालुक्यात ११ कोटींची वसुली...तालुका - कर वसुलीअहमदपूर - ७ कोटी ३३ लाखऔसा - ११ कोटी ५ लाखचाकूर - ४ कोटी ७४ लाखदेवणी - २ कोटी ५० लाखजळकोट - १ कोटी ८३ लाखलातूर - ८ कोटी ९८ लाखनिलंगा - ९ कोटी ९२ लाखरेणापूर - ३ कोटी ७४ लाखशिरुर अनं. - १ कोटी ९० लाखउदगीर - ६ कोटी २१ लाखएकूण - ५८ कोटी २४ लाख

महिनाभरात ९ कोटींचा कर भरणा...फेब्रुवारीअखेरपर्यंत जिल्ह्यात ४८ कोटी ९० लाख १३ हजार रुपयांची कर वसुली झाली होती. आणखीन १३ कोटी ६६ लाख ११ हजारांची वसुली थकित राहिली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी मार्चमध्ये कर वसुली पंधरवडा राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या नियोजनाखाली गावोगावी पथके नियुक्ती करण्यात आले होते. त्यामुळे १५ दिवसांत जवळपास ९ कोटींची कर वसुली झाली आहे.

टॅग्स :laturलातूरTaxकर