शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात चार हजार प्रौढांच्या साक्षरतेची होणार परीक्षा, प्रमाणपत्र मिळणार

By संदीप शिंदे | Updated: March 15, 2024 16:26 IST

४१० केंद्रावर केली परीक्षेची सोय करण्यात आली आहे

लातूर : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता जिल्ह्यातील ४ हजार २८८ प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या रविवारी ही तीन तासांची लेखी परीक्षा होणार आहे. याबाबत योजना शिक्षण संचालकांनी सुचना केल्या आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे. जिल्ह्यात ४१० केंद्र असून, ४ हजार २८८ प्रौढ निरक्षर या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

१५ वर्षांवरील निरक्षरांसाठी नव भारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत किती प्रौढ निरक्षर आता साक्षर झाले याची चाचणी रविवारी घेतली जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ४ हजार २८८ निरक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी झाली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. निरक्षर व्यक्ती या दरम्यान त्याच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देऊ शकणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ मिळणार आहे. उत्तरे लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा लागणार आहे.

लातूर ग्रामीणमध्ये ३८ केंद्रावर ३९१, रेणापूर तालुक्यात १२ केंद्रावर २४, औसा १९ केंद्रावर २२१, निलंगा २४ केंद्रावर ९४, शिरुर अनंतपाळ १० केंद्रावर ६१, देवणी ९ केंद्रावर ६५, उदगीर ३८ केंद्रावर २५४, जळकोट ६७ केंद्रावर १४१४, अहमदपूर ११० केंद्रावर ९१०, चाकूर ६१ केंद्रावर ७९३ तर लातूर तालुक्यात २२ केंद्रावर ५८ प्रौढ निरक्षर परीक्षा देणार आहेत.

परीक्षेसाठी अशी राहणार प्रश्नपत्रिका...प्रश्नपत्रिका एकूण १५० गुणांची असून ती पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित तीन भागांमध्ये विभागलेली असेल. भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख लेखन ५० गुण, भाग-ग संख्याज्ञान ५० गुण अशी गुणविभागणी आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळविणे आवश्यक आहे. एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळविणे आवश्यक असल्याचे योजना विभागाकडून सांगण्यात आले.

ज्या शाळेत नोंदणी तेच केंद्र राहणार...ज्या शाळेतून असाक्षर व्यक्तींची नोंदणी करण्यात आली आहे, ती शाळाच परीक्षा केंद्र राहील. परीक्षेस येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा फोटो, मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणावे. लातूर जिल्ह्यात ४१० केंद्रावर ४ हजार २८८ प्रौढ निरक्षर परीक्षा देणार असून, तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सांयकाळी ५ सोयीच्या वेळेनुसार येऊन तीन तासांचा पेपर देता येणार आहे. - अरुणा काळे, उपशिक्षणाधिकारी योजना विभाग

टॅग्स :Educationशिक्षणlaturलातूर