शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातूर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ३९ हजार विद्यार्थी, १५४ केंद्रावर होणार परीक्षा

By संदीप शिंदे | Updated: February 29, 2024 15:52 IST

शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होणार आहे

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. लातूर जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. बोर्डाच्या वतीने १५३ केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शालेय जीवनात दहावीची परीक्षा महत्वाची समजली जाते. जिल्ह्यातील ३९ हजार ७१ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी विषयाचा पेपर होणार असून, लातूर विभागीय मंडळ आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने २२ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा दक्षता समितीच्य बैठकीतील चर्चेनुसार २९ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळही मिळणार असून, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षेदिवशी बैठे पथकही तैनात राहणार आहे. लातूर तालुक्यात ५१ केंद्रावर १४०६५, औसा १३ केंद्रावर ३१०४, निलंगा १६ केंद्रावर ४००१, शिरुर अनंतपाळ ४ केंद्रावर ८४३, देवणी ६ केंद्रावर १२९३, उदगीर २५ केंद्रावर ६०६९, जळकोट ४ केंद्रावर १००२, अहमदपूर १९ केंद्रावर ४६४४ आणि रेणापूर तालुक्यातील ६ केंद्रावर १ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील परीरक्षक नियुक्त करण्यात आले असून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांचे विशेष पथक जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

२९ भरारी पथकांची नियुक्ती...दहावीच्या इंग्रजी, गणित व विज्ञान विषयाच्या पेपरच्या दिवशी भरारी पथकांची विविध केंद्रांना भेटी राहणार आहेत. यासाठीह २९ पथके नियुक्त करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरssc examदहावी