शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

लातूरच्या न्यू काझी मोहल्ला परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा; कारणांचा मनपाला शोध लागेना

By हणमंत गायकवाड | Updated: January 8, 2024 18:27 IST

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

लातूर: शहरातील न्यू काझी मोहल्ला परिसरातील रुखय्या बेगम हायस्कूल रोड परिसरात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही की अशुद्ध पाणीपुरवठा कशामुळे होत आहे, याबाबतचे कारण शोधले जात नाही. नागरिकांना मात्र अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अभियंता तसेच विद्यमान अभियंतांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहिलेले आहे. दरम्यान, उपायुक्त मयुरा शेंद्रेकर यांची या भागातील नागरिकांनी भेट घेऊन अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचे गाऱ्हाणे मांडले. याबाबत उपायुक्त शेंद्रेकर यांनी या भागातील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना बोलून तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय, त्यांनी त्यांच्या दालनात पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांची बैठकही बोलवली आहे.

नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा.....पाणी सोडणारे लाइनमन, जलकुंभ प्रमुख, शाखा अभियंता तसेच पाणीपुरवठा अभियंतांकडे निवेदनाद्वारे समस्या सोडविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. आठ दिवसांमध्ये शुद्ध पाणी नळाला द्यावे अन्यथा मनपा आयुक्त, पाणीपुरवठा अभियंता यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी अर्बन सेल व स्थानिक कलीम अ.रहेमान उस्ताद यांच्या वतीने मनपा प्रशासनाला दिला आहे.

नागरिकांच्या वतीने उपायुक्तांना निवेदन.....निवेदनावर कलीम अ. रहेमान उस्ताद, जाकीर तांबोळी, डी. उमाकांत, शेख वसीम अक्रम खय्युम, इरफान रशीद पठाण, महेबुब खान, सफीउल्ला खान, शेख रसुलसाब, शेख बाबूसाब, शेख इब्राहिम नजीरमिया, शेख रोशन, शेख रफीक, शेख फारुख, अब्दुल सत्तार, शेख इमरोज, शेख मिनहाज, इरफान रज्जाक, राज मणियार यांच्यासह अनेक महिलांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत.

समस्या असेल तर तत्काळ उपाययोजनासगळीकडे शुद्ध पाणीपुरवठा आहे. न्यू काझी मोहल्ला परिसरातही शुद्ध पाणीपुरवठा होत आहे. तरीही काही समस्या असतील तर त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.- विजयकुमार चव्हाण कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, लातूर मनपा

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी