शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा; २ मोटारी, १४ स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

By हणमंत गायकवाड | Updated: March 21, 2024 17:29 IST

पाणी पिण्यासाठी आरक्षित : प्रकल्पाच्या उजव्या बाजूने बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकांकडून पडताळणी

लातूर : मांजरा प्रकल्पातील पाणीलातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब व अन्य गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पावर पाटबंधारे विभागासह महसूल आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या पथकाचा पहारा आहे. दरम्यान, गुरुवारी बीड जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने मांजरा प्रकल्पाच्या डाव्या बाजूने अचानक पडताळणी केली असता अवैध पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात दोन वीज मोटारी, १४ स्टार्टर, १४ बंडल वायर तसेच हस्ती पाइपचे ५३ नग आदी साहित्याचा समावेश आहे.

बीडचे अप्पर जिल्हाधिकारी कुलकर्णी, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, केजचे तहसीलदार अभिजीत जगताप, मांजरा प्रकल्पाचे शाखाधिकारी सूरज निकम, तलाठी, तहसील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी मांजरा प्रकल्प डाव्या बाजूने अवैध पाणी उपसा होत असलेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन पडताळणी केली. यावेळी २ मोटर, १४ वायर बंडल, १४ स्टार्टर, ५३ नग हस्ती पाइप जप्त करण्यात आले आहेत. मांजरा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला पाणी घेऊ नये असे निर्देशित केले आहे. तरीपण प्रकल्पाच्यावर असलेले अनेकजण मोटारी लावून पाण्याचा अनधिकृत उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुरुवारी साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पाटबंधारे, महसूल आणि महावितरणच्या संयुक्त पथकाचा प्रकल्पावर पहारा....मांजरा प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, उपलब्ध पाणी पिण्यासाठीच वापरले जावे, यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महसूल आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाचा पहारा प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने आहे. तरीपण गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी डाव्या बाजूने पाण्याचा अनधिकृत उपसा होत तर नाही ना, याची पडताळणी केली. यावेळी उपसा करण्यासाठी वापरात येणारे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लातूर महापालिकेने केली महिन्याला अर्धा दलघमीची पाण्याची बचत...लातूर महानगरपालिकेच्या वतीने दररोज मांजरा प्रकल्पातून पाणी उचलले जात होते. मात्र संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लातूरमध्ये पाण्याची उचल कमी केली आहे. तीन दिवस उचल बंद केली आहे. महिन्याला एक दलघमी पाण्याची उचल आहे. यापूर्वी दीड दलघमी पाण्याची उचल केली जात होती. आता एक दलघमी पाणी उचलले जाते. यामुळे महिन्याला अर्धा दलघमीची बचत होत आहे. दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या या बचतीचा उपक्रम अन्य संस्थांनी राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पात ६३ दलघमी पाणी...मांजरा प्रकल्पात ६३ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास पाऊस नाही पडला तरी सप्टेंबर अखेर पाणी पुरेल असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. मात्र मांजरा प्रकल्पावर मोटारी लावून पाणी उपसा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीManjara Damमांजरा धरण