शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा प्रकल्पावर पाण्याचा अवैध उपसा; २ मोटारी, १४ स्टार्टर, वायर बंडल अन् हस्ती पाइप जप्त

By हणमंत गायकवाड | Updated: March 21, 2024 17:29 IST

पाणी पिण्यासाठी आरक्षित : प्रकल्पाच्या उजव्या बाजूने बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकांकडून पडताळणी

लातूर : मांजरा प्रकल्पातील पाणीलातूर शहर, लातूर एमआयडीसी, अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब व अन्य गावांसाठी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पावर पाटबंधारे विभागासह महसूल आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या पथकाचा पहारा आहे. दरम्यान, गुरुवारी बीड जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने मांजरा प्रकल्पाच्या डाव्या बाजूने अचानक पडताळणी केली असता अवैध पाणी उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात दोन वीज मोटारी, १४ स्टार्टर, १४ बंडल वायर तसेच हस्ती पाइपचे ५३ नग आदी साहित्याचा समावेश आहे.

बीडचे अप्पर जिल्हाधिकारी कुलकर्णी, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, केजचे तहसीलदार अभिजीत जगताप, मांजरा प्रकल्पाचे शाखाधिकारी सूरज निकम, तलाठी, तहसील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी मांजरा प्रकल्प डाव्या बाजूने अवैध पाणी उपसा होत असलेल्या ठिकाणी अचानक भेटी देऊन पडताळणी केली. यावेळी २ मोटर, १४ वायर बंडल, १४ स्टार्टर, ५३ नग हस्ती पाइप जप्त करण्यात आले आहेत. मांजरा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला पाणी घेऊ नये असे निर्देशित केले आहे. तरीपण प्रकल्पाच्यावर असलेले अनेकजण मोटारी लावून पाण्याचा अनधिकृत उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुरुवारी साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

पाटबंधारे, महसूल आणि महावितरणच्या संयुक्त पथकाचा प्रकल्पावर पहारा....मांजरा प्रकल्पातील पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये, उपलब्ध पाणी पिण्यासाठीच वापरले जावे, यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महसूल आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाचा पहारा प्रकल्पाच्या दोन्ही बाजूने आहे. तरीपण गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी डाव्या बाजूने पाण्याचा अनधिकृत उपसा होत तर नाही ना, याची पडताळणी केली. यावेळी उपसा करण्यासाठी वापरात येणारे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लातूर महापालिकेने केली महिन्याला अर्धा दलघमीची पाण्याची बचत...लातूर महानगरपालिकेच्या वतीने दररोज मांजरा प्रकल्पातून पाणी उचलले जात होते. मात्र संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता लातूरमध्ये पाण्याची उचल कमी केली आहे. तीन दिवस उचल बंद केली आहे. महिन्याला एक दलघमी पाण्याची उचल आहे. यापूर्वी दीड दलघमी पाण्याची उचल केली जात होती. आता एक दलघमी पाणी उचलले जाते. यामुळे महिन्याला अर्धा दलघमीची बचत होत आहे. दरम्यान, लातूर महानगरपालिकेच्या या बचतीचा उपक्रम अन्य संस्थांनी राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पात ६३ दलघमी पाणी...मांजरा प्रकल्पात ६३ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा वापर काटकसरीने केल्यास पाऊस नाही पडला तरी सप्टेंबर अखेर पाणी पुरेल असे पाटबंधारे विभागातून सांगण्यात आले. मात्र मांजरा प्रकल्पावर मोटारी लावून पाणी उपसा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीManjara Damमांजरा धरण