शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

उघड्यावर कचरा जाळाल तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार

By हणमंत गायकवाड | Updated: December 29, 2023 19:38 IST

लातूरात सहा महिन्यात २६ जणांवर कारवाई: २९ हजार रुपयांचा दंड वसूल

लातूर : लातूर शहरामध्ये दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत असले तरी उघड्यावर कचरा जळण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. त्या विरोधात महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोहीम राबविली असून गेल्या सहा महिन्यात २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही पुन्हा कचरा जाळला तर आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या स्वच्छता विभागाचे पथक कार्यरत झाले आहे.

महानगरपालिकेकडून दररोज घंटागाडीद्वारे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो. दोन्ही मिळून दीडशे ते साडेतीनशे टन कचरा संकलित होतो. तरीही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. विशेष करून खाजगी आस्थापनांच्या मालकांकडून कचरा जाळण्याच्या घटना घडतात. त्यावर आता महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाची नजर राहणार आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला, त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असे महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी सांगितले.

कचरा पेटविल्याने मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे...ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद आहे. असे असले तरी अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. आतापर्यंत कचरा पेटविल्याने कित्येक मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे आहेत. गोदामांना आग, उद्यानांना आग, भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना अशा निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मनपाचा विचार आहे. प्रारंभी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

उघड्यावर कचरा पेटविणे कायद्यानुसार गुन्हा...उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हवा प्रदूषित होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे.

फौजदारी गुन्हे दाखल होणारगेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला. त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. आता वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. -रमाकांत पिडगे, स्वच्छता विभाग प्रमुख, लातूर मनपा

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न