शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

उघड्यावर कचरा जाळाल तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार

By हणमंत गायकवाड | Updated: December 29, 2023 19:38 IST

लातूरात सहा महिन्यात २६ जणांवर कारवाई: २९ हजार रुपयांचा दंड वसूल

लातूर : लातूर शहरामध्ये दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात येत असले तरी उघड्यावर कचरा जळण्याच्या घटना दररोजच घडत आहेत. त्या विरोधात महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने मोहीम राबविली असून गेल्या सहा महिन्यात २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही पुन्हा कचरा जाळला तर आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने मनपाच्या स्वच्छता विभागाचे पथक कार्यरत झाले आहे.

महानगरपालिकेकडून दररोज घंटागाडीद्वारे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो. दोन्ही मिळून दीडशे ते साडेतीनशे टन कचरा संकलित होतो. तरीही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. विशेष करून खाजगी आस्थापनांच्या मालकांकडून कचरा जाळण्याच्या घटना घडतात. त्यावर आता महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या पथकाची नजर राहणार आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला, त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, असे महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी सांगितले.

कचरा पेटविल्याने मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे...ज्यांच्या आवारात कचरा पेटविण्यात आल्याचे आढळून आले, त्यांनाही यासाठी जबाबदार धरण्याची कायद्यात तरतूद आहे. असे असले तरी अशा स्वरूपाची कारवाई होताना दिसत नाही. आतापर्यंत कचरा पेटविल्याने कित्येक मोठ्या आगी लागल्याची उदाहरणे आहेत. गोदामांना आग, उद्यानांना आग, भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना अशा निष्काळजीपणामुळे घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मनपाचा विचार आहे. प्रारंभी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

उघड्यावर कचरा पेटविणे कायद्यानुसार गुन्हा...उघड्यावर कचरा पेटविणे हा पर्यावरण विषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसारही गुन्हा आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकांना यावर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. हवा प्रदूषित होते म्हणून पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार धोकादायक कृत्य म्हणूनही हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.याशिवाय उपद्रवी कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल तर कलम २७७ तसेच कलम २६९ नुसारसुद्धा कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. कचरा कोणी पेटविला याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायची आहे.

फौजदारी गुन्हे दाखल होणारगेल्या सहा महिन्यांमध्ये २६ व्यक्तींनी कचरा जाळला. त्यांच्याकडून २९ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला आहे. हजार रुपये व त्यापेक्षा अधिक दंड करण्याची तरतूद आहे. आता वारंवार त्याच त्याच व्यक्तींकडून कचरा जाळला जात असेल तर आता फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. -रमाकांत पिडगे, स्वच्छता विभाग प्रमुख, लातूर मनपा

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न