शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

HSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ८९.७९ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 14:18 IST

बारावी निकाल : यंदाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बाहेर पडता आले नाही.

ठळक मुद्देलातूर बोर्ड राज्यात सहाव्या क्रमांकावर

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेस मंडळातून ८६ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५ हजार ५६९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७६ हजार ८३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, लातूर विभागीय मंडळाची टक्केवारी ८९.७९ आली आहे़ मात्र, यंदाच्या कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी बाहेर पडता आले नाही.

लातूर विभागीय मंडळातंर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातून ३६ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३१ हजार ९९९ उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.९४ एवढी आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातून १५ हजार १०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार २७२ उत्तीर्ण झाले. या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.८६ अशी आहे़ तर लातूर जिल्ह्यातून ३४ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३१ हजार ५६१ उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९२.६१ वर पोहचली आहे़ विभागीय मंडळात लातूर जिल्हा निकालात अव्वल स्थानावर आला आहे. त्यापाठोपाठ नांदेड व उस्मानाबादचा क्रमांक लागतो.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूरStudentविद्यार्थी