शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By हरी मोकाशे | Updated: June 21, 2023 17:38 IST

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही.

लातूर : मृग नक्षत्र संपत आले तरी अद्याप वरुणराजाची बरसात नाही. पावसाळ्याच्या दिवसांत मे महिन्यापेक्षा अधिक तीव्र उन्हं जाणवत आहे. परिणामी, जलसाठे आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत आणखीन २१ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अधिक उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार असा अंदाज व्यक्त होत होता. रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने मे महिन्यात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे पावसाळा कधी सुरू होईल आणि वरुणराजा कधी बरसेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. तीव्र उन्हामुळे जलसाठे आटू लागले होते तर जलस्त्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या.

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय, पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत असून, त्यातील १०३ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक चटके...जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून १०३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

२० गावांतील नागरिक हैराण...१२३ पैकी १०३ गावांत अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही २० गावांत अधिग्रहण सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील अबालवृद्धांना भरउन्हात पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. या गावांत तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे...तालुका                                    गावेलातूर                                     ०५औसा                                     ३१निलंगा                                     ०४रेणापूर                                     ०६अहमदपूर                         ३९चाकूर                                     ०७शिरूर अनंत.                         ००उदगीर                                     ०६देवणी                                     ००जळकोट                                    ०५

देवणी, शिरूर अनंतपाळ टंचाईमुक्त...जिल्ह्यातील देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत अद्याप एकही अधिग्रहण करण्यात आलेले नाही. अहमदपूर तालुक्याच्या पाठोपाठ औसा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. तिथे ३४ गावांत पाणीटंचाई असून, सध्या अधिग्रहणाद्वारे ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टंचाईच्या झळा वाढल्या...एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यातील ३० गावांत पाणीटंचाई जाणवत होती. तेव्हा १५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात टंचाई वाढून ती ८५ गावांना जाणवत होती. ६२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात १०२ गावे टंचाईने त्रस्त झाली. ९० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरRainपाऊस