शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By हरी मोकाशे | Updated: June 21, 2023 17:38 IST

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही.

लातूर : मृग नक्षत्र संपत आले तरी अद्याप वरुणराजाची बरसात नाही. पावसाळ्याच्या दिवसांत मे महिन्यापेक्षा अधिक तीव्र उन्हं जाणवत आहे. परिणामी, जलसाठे आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत आणखीन २१ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अधिक उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार असा अंदाज व्यक्त होत होता. रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने मे महिन्यात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे पावसाळा कधी सुरू होईल आणि वरुणराजा कधी बरसेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. तीव्र उन्हामुळे जलसाठे आटू लागले होते तर जलस्त्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या.

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय, पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत असून, त्यातील १०३ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक चटके...जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून १०३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

२० गावांतील नागरिक हैराण...१२३ पैकी १०३ गावांत अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही २० गावांत अधिग्रहण सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील अबालवृद्धांना भरउन्हात पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. या गावांत तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे...तालुका                                    गावेलातूर                                     ०५औसा                                     ३१निलंगा                                     ०४रेणापूर                                     ०६अहमदपूर                         ३९चाकूर                                     ०७शिरूर अनंत.                         ००उदगीर                                     ०६देवणी                                     ००जळकोट                                    ०५

देवणी, शिरूर अनंतपाळ टंचाईमुक्त...जिल्ह्यातील देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत अद्याप एकही अधिग्रहण करण्यात आलेले नाही. अहमदपूर तालुक्याच्या पाठोपाठ औसा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. तिथे ३४ गावांत पाणीटंचाई असून, सध्या अधिग्रहणाद्वारे ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टंचाईच्या झळा वाढल्या...एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यातील ३० गावांत पाणीटंचाई जाणवत होती. तेव्हा १५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात टंचाई वाढून ती ८५ गावांना जाणवत होती. ६२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात १०२ गावे टंचाईने त्रस्त झाली. ९० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरRainपाऊस