शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

HHC Exam: लातुरात ९२ परीक्षा केंद्रांवरील ३६ हजार विद्यार्थ्यांवर २९ भरारी पथकांची नजर

By संदीप शिंदे | Updated: February 20, 2023 18:20 IST

बारावीच्या परीक्षेला १७ परीरक्षकांची नियुक्ती : लातूर जिल्ह्यात ९२ केंद्रांची स्थापना

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ९२ केेंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३५ हजार ९०६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. या परीक्षेसाठी १७ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, पाच भरारी पथके राहणार आहेत. यामध्ये एक महिलांचे पथकही तैनात राहणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे.

जिल्ह्यात ३५ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. त्यानुसार मंगळवारी पहिला पेपर होणार आहे. बारावीसाठी लातूर तालुक्यात ३२, औस्ा ८, निलंगा ९, शिरुर अनंतपाळ २, देवणी ४, जळकोट ३, उदगीर १२, चाकूर ६, अहमदपूर ११ तर रेणापूर तालुक्यात ५ असे एकूण ९२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर महसूलच्या पथक परीक्षेच्या एक तासापुर्वीच हजर राहणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटरही बंद ठेवण्याच्या सुचना आहेत. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना परवानगी नसून, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जि.प. सीईओ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. दरम्यान, इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पाच भरारी पथकांची नियुक्ती...बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचे स्वतंत्र पथक राहणार आहे. सोबतच महसूल, शिक्षण आणि पोलीसांचे पथक विविध केंद्रावर पाहणी करणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे.

परीक्षेसाठी १० मिनिटे जास्त...दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपुर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली होती. मात्र, परीक्षेच्या वेळेत दहा मिनिटांनी वाढ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे...विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपुर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता उपस्थित रहावे. त्यानंतर परीक्षा दालनात सकाळी ११ तसेच दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेच्या वितरण व लेखनास प्रारंभ होणार आहे. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणlaturलातूर