शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

HHC Exam: लातुरात ९२ परीक्षा केंद्रांवरील ३६ हजार विद्यार्थ्यांवर २९ भरारी पथकांची नजर

By संदीप शिंदे | Updated: February 20, 2023 18:20 IST

बारावीच्या परीक्षेला १७ परीरक्षकांची नियुक्ती : लातूर जिल्ह्यात ९२ केंद्रांची स्थापना

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात ९२ केेंद्रावर ही परीक्षा होणार असून, ३५ हजार ९०६ विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. या परीक्षेसाठी १७ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, पाच भरारी पथके राहणार आहेत. यामध्ये एक महिलांचे पथकही तैनात राहणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.२१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार आहे.

जिल्ह्यात ३५ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. त्यानुसार मंगळवारी पहिला पेपर होणार आहे. बारावीसाठी लातूर तालुक्यात ३२, औस्ा ८, निलंगा ९, शिरुर अनंतपाळ २, देवणी ४, जळकोट ३, उदगीर १२, चाकूर ६, अहमदपूर ११ तर रेणापूर तालुक्यात ५ असे एकूण ९२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी, यासाठी प्रत्येक केंद्रावर महसूलच्या पथक परीक्षेच्या एक तासापुर्वीच हजर राहणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांची झडती घेतली जाणार असून, केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटरही बंद ठेवण्याच्या सुचना आहेत. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना परवानगी नसून, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जि.प. सीईओ परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. दरम्यान, इंग्रजी, विज्ञान आणि गणित या विषयांच्या पेपरच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पाच भरारी पथकांची नियुक्ती...बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिलांचे स्वतंत्र पथक राहणार आहे. सोबतच महसूल, शिक्षण आणि पोलीसांचे पथक विविध केंद्रावर पाहणी करणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे.

परीक्षेसाठी १० मिनिटे जास्त...दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपुर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्याची पद्धत बंद केली होती. मात्र, परीक्षेच्या वेळेत दहा मिनिटांनी वाढ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी बारावीचा पहिला पेपर होणार आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे...विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपुर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे. सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता उपस्थित रहावे. त्यानंतर परीक्षा दालनात सकाळी ११ तसेच दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेच्या वितरण व लेखनास प्रारंभ होणार आहे. तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणlaturलातूर