शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. ...

आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा या गावचे साठवण तलाव व पाझर तलाव काठोकाठ भरल्याने नद्यांना पूर येऊन जळकोट, रावणकोळा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातील १२ साठवण तलाव सोनवळा, करंजी, चेरा-१, चेरा-२, डोंगरगाव, ढोरसांगवी, जंगमवाडी, गुत्ती, माळहिप्परगा, हळदवाढवणा, रावणकोळा, जिरगा सर्व साठवून तलावे व पाझर तलाव हे ओव्हरफ्लो झाले असल्याने त्या खालील नदीला पूर आला आहे. पाण्यामुळे नदीकाठच्या, नाल्या काठच्या जमिनी खचून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. वस्तीत व शेतीमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन व उसाचे अतोनात नुकसान झाले आहे.

जळकोट येथील जांब रस्त्यावरील पाझर तलाव शंभर टक्के भरल्याने व पाणी जास्त कोंडल्याने तळ्याखालील शेतकऱ्यांनी प्रशासनाला सूचना देऊन तेथील तळ्याचा सांडवा फोडून पाण्याला वाट करून दिली आहे. यावेळी तलाठी युवराज करेप्पा उपस्थित होते. कुणकी वरून जाणारा धामणगाव, जिरगा, डोमगाव रस्ता नदीला पूर आल्याने बंद झाला आहे. नगदी हाताला आलेले सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. या नुकसान भरपाईचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व पीक विमा लागू करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

अतरनूरमध्ये शिरले घरात पाणी...

अतनूर : पावसाच्या पाण्यामुळे अतनूर तिरू येथील नदीला पूर आला असून तिरू नदीवरील अतनूर गावालगत असलेल्या ३५ वर्षांनंतरचा जीर्ण झालेल्या पुलावरून पाणी तुडुंब भरून वाहत असल्याने दळणवळण व वाहतूक व्यवस्था ठप्प असून राज्य मार्ग संपूर्णत: बंद आहे. तसेच अतनूर गावातील नाली, रस्त्यावर कंबरे एवढे पाणी वाहत असल्याने व पाणी जाण्यासाठी पर्यायी नाली व सिमेंट रस्ते नसल्यामुळे घराघरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे, अन्न धान्ये, कपडे-लते सह इत्तर वस्तूची नासाडी झाली आहे. अतनूर तिरू नदीला महापूर आल्याने अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव, तिरूका, बेळसांगवी गावालगत व तिरू नदी लगतच्या जमीन व शेतजमिनीवरील खरीप पिके जोरदार अतिवृष्टीने संपूर्णत: खरडून गेली आहेत.