शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

जळकोटात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST

जळकोट : शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना ...

जळकोट : शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी ३ ते ४.३० या दरम्यान दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असून, परिसरातील नदी-नाले भरुन वाहू लागले आहेत. शहरात आतापर्यंत ३०५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद तहसील कार्यालयात झाली आहे.

तालुक्यात जूनमध्ये पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आणि खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, पावसाने १० ते १२ दिवस उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. दरम्यान, जुलैमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी रिमझिम पाऊस झाला होता. रविवारी दुपारी दीड तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले वाहू लागले आहेत. जळकोट मंडलात सर्वाधिक पाऊस झाला आहे. घोणसी महसूल मंडलात कमी पाऊस झाला आहे. रविवारच्या पावसामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

मागील पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके वाळत होती. मात्र, मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे. जोरदार वाऱ्यामुळे दोन तास वीज गुल झाली होती. या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, सूर्यफुल, कापूस पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे.