शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2024 18:17 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे अखेरीस २.६७ मीटरची घट

हरी मोकाशे, लातूर: मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी उन्हाची धग कायम आहे. दरम्यान, मे अखेरीसच्या निरीक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी २.६७ मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून मृगास प्रारंभ झाल्याने आशा उंचावल्या असून सर्वांचे वरुणराजाकडे लक्ष लागून आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पांमध्ये जलसंचय झाला नसल्याने हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होऊ लागली. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत २.१३ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता मे अखेरीसच्या निरीक्षणात आणखीन घट होऊन २.६७ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

सर्वच तालुक्यांच्या पाणीपातळीत घट

तालुका - घट (मीटरमध्ये)

  • अहमदपूर - ३.७६
  • औसा - ३.३९
  • चाकूर - २.९६
  • देवणी - १.२९
  • जळकोट - १.५४
  • लातूर - १.४७
  • निलंगा - ३.२७
  • रेणापूर - २.१४
  • शिरुर अनं.- ४.७१
  • उदगीर - २.१२
  • सरासरी - २.६७

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी पावसाळापूर्व म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस निश्चित विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत २.६७ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक पाणीपातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. ४.७१ मीटरने घट झाली आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर - ३.७६, औसा- ३.३९ मीटरने कमी झाली आहे.

दोन वर्षांपासून सातत्याने घट...

  • २०२४ : -२.६७
  • २०२३ : ०.४६
  • २०२२ : २.१९

जिल्ह्यातील ४६ गावांना टँकरने पाणीपुरवठा...

सध्या जिल्ह्यातील ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक गावे लातूर तालुक्यातील असून ११ अशी संख्या आहे. औश्यातील १०, रेणापूर- २, उदगीर - ४, अहमदपूर- ९, जळकोट तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर सुरु आहेत. चाकूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या चार तालुक्यांत एकही टँकर नाही.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस