शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2024 18:17 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे अखेरीस २.६७ मीटरची घट

हरी मोकाशे, लातूर: मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी उन्हाची धग कायम आहे. दरम्यान, मे अखेरीसच्या निरीक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी २.६७ मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून मृगास प्रारंभ झाल्याने आशा उंचावल्या असून सर्वांचे वरुणराजाकडे लक्ष लागून आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पांमध्ये जलसंचय झाला नसल्याने हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होऊ लागली. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत २.१३ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता मे अखेरीसच्या निरीक्षणात आणखीन घट होऊन २.६७ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

सर्वच तालुक्यांच्या पाणीपातळीत घट

तालुका - घट (मीटरमध्ये)

  • अहमदपूर - ३.७६
  • औसा - ३.३९
  • चाकूर - २.९६
  • देवणी - १.२९
  • जळकोट - १.५४
  • लातूर - १.४७
  • निलंगा - ३.२७
  • रेणापूर - २.१४
  • शिरुर अनं.- ४.७१
  • उदगीर - २.१२
  • सरासरी - २.६७

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी पावसाळापूर्व म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस निश्चित विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत २.६७ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक पाणीपातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. ४.७१ मीटरने घट झाली आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर - ३.७६, औसा- ३.३९ मीटरने कमी झाली आहे.

दोन वर्षांपासून सातत्याने घट...

  • २०२४ : -२.६७
  • २०२३ : ०.४६
  • २०२२ : २.१९

जिल्ह्यातील ४६ गावांना टँकरने पाणीपुरवठा...

सध्या जिल्ह्यातील ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक गावे लातूर तालुक्यातील असून ११ अशी संख्या आहे. औश्यातील १०, रेणापूर- २, उदगीर - ४, अहमदपूर- ९, जळकोट तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर सुरु आहेत. चाकूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या चार तालुक्यांत एकही टँकर नाही.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस