शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

उकाडा कमी होईना... धग कायम! भूजलपातळी आणखी खालावली, वरुणराजाकडे लक्ष

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2024 18:17 IST

मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे अखेरीस २.६७ मीटरची घट

हरी मोकाशे, लातूर: मान्सूनपूर्व पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी उन्हाची धग कायम आहे. दरम्यान, मे अखेरीसच्या निरीक्षणात जिल्ह्याची भूजल पातळी २.६७ मीटरने खालावल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून मृगास प्रारंभ झाल्याने आशा उंचावल्या असून सर्वांचे वरुणराजाकडे लक्ष लागून आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पांमध्ये जलसंचय झाला नसल्याने हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. तद्नंतर फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होऊ लागली. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत २.१३ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता मे अखेरीसच्या निरीक्षणात आणखीन घट होऊन २.६७ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.

सर्वच तालुक्यांच्या पाणीपातळीत घट

तालुका - घट (मीटरमध्ये)

  • अहमदपूर - ३.७६
  • औसा - ३.३९
  • चाकूर - २.९६
  • देवणी - १.२९
  • जळकोट - १.५४
  • लातूर - १.४७
  • निलंगा - ३.२७
  • रेणापूर - २.१४
  • शिरुर अनं.- ४.७१
  • उदगीर - २.१२
  • सरासरी - २.६७

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षी पावसाळापूर्व म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस निश्चित विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणीपातळीत २.६७ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक पाणीपातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली आहे. ४.७१ मीटरने घट झाली आहे. त्यापाठोपाठ अहमदपूर - ३.७६, औसा- ३.३९ मीटरने कमी झाली आहे.

दोन वर्षांपासून सातत्याने घट...

  • २०२४ : -२.६७
  • २०२३ : ०.४६
  • २०२२ : २.१९

जिल्ह्यातील ४६ गावांना टँकरने पाणीपुरवठा...

सध्या जिल्ह्यातील ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक गावे लातूर तालुक्यातील असून ११ अशी संख्या आहे. औश्यातील १०, रेणापूर- २, उदगीर - ४, अहमदपूर- ९, जळकोट तालुक्यातील १० गावांमध्ये टँकर सुरु आहेत. चाकूर, देवणी, निलंगा आणि शिरुर अनंतपाळ या चार तालुक्यांत एकही टँकर नाही.

टॅग्स :laturलातूरRainपाऊस