शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

हणमंतवाडी नाही अलगरवाडी; चुकीच्या फलकामुळे प्रवाशांची होतेय दिशाभूल!

By संदीप शिंदे | Updated: April 1, 2024 13:35 IST

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

चाकूर : विकासाच्या माध्यमातून तालुका पातळीवरून राज्य पातळीपर्यंत अलगरवाडी गावाने डंका वाजविला. अलगरवाडी गावाची ओळख या विकासाच्या माध्यमातून सर्वदूरपर्यंत करून दिली. दरम्यान, लातूर ते नांदेड महामार्गावर असलेल्या या गावापासून रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला असून, अलगरवाडी गाव दर्शविणारे फलकाच्या जागी चक्क हणमंतवाडी गावाचा फलक बसविण्यात आल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे.

चाकूरपासून तीन किलोमीटर अंतरावर चारालिंब पाटी ही अनेक दकशांपासूनची ओळख आहे. येथे उतरून अवघ्या दोन-तीन फर्लांग अंतरावर अलगरवाडी हे गाव आहे. ग्रामस्वच्छता अभियानात तालुका पातळीपासून ते राज्यस्तरावर अलगरवाडी गावाचे नाव सर्वदूर परिचित झाले आहे. मात्र, रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत.

अलगरवाडी गावाच्या शोधात अनेक जण ८ ते १० किलोमीटरचा फेरा मारतात. हणमंतवाडी गावात जाणारे प्रवाशी फलक पाहून थेट अलगरवाडी गावात जातात. तेथे विचारपूस करून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो. नाव बदलून हणमंतवाडी नावाचा फलक गावच्या दोन्ही बाजूच्या दिशेने लावण्यात आला असल्यामुळे बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अलगरवाडीच्या ग्रामस्थांनी अनेकदा ही बाब राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यावर काही एक उपाययोजना करण्यात आली नाही. अलगरवाडी गावाचा फलक रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विनाकारण आठ ते दहा किमीची चक्कर...रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत. याकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :laturलातूरhighwayमहामार्ग