शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हणमंतवाडी नाही अलगरवाडी; चुकीच्या फलकामुळे प्रवाशांची होतेय दिशाभूल!

By संदीप शिंदे | Updated: April 1, 2024 13:35 IST

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

चाकूर : विकासाच्या माध्यमातून तालुका पातळीवरून राज्य पातळीपर्यंत अलगरवाडी गावाने डंका वाजविला. अलगरवाडी गावाची ओळख या विकासाच्या माध्यमातून सर्वदूरपर्यंत करून दिली. दरम्यान, लातूर ते नांदेड महामार्गावर असलेल्या या गावापासून रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला असून, अलगरवाडी गाव दर्शविणारे फलकाच्या जागी चक्क हणमंतवाडी गावाचा फलक बसविण्यात आल्याने प्रवाशांची दिशाभूल होत आहे.

चाकूरपासून तीन किलोमीटर अंतरावर चारालिंब पाटी ही अनेक दकशांपासूनची ओळख आहे. येथे उतरून अवघ्या दोन-तीन फर्लांग अंतरावर अलगरवाडी हे गाव आहे. ग्रामस्वच्छता अभियानात तालुका पातळीपासून ते राज्यस्तरावर अलगरवाडी गावाचे नाव सर्वदूर परिचित झाले आहे. मात्र, रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत.

अलगरवाडी गावाच्या शोधात अनेक जण ८ ते १० किलोमीटरचा फेरा मारतात. हणमंतवाडी गावात जाणारे प्रवाशी फलक पाहून थेट अलगरवाडी गावात जातात. तेथे विचारपूस करून पुन्हा परतीचा प्रवास सुरू होतो. नाव बदलून हणमंतवाडी नावाचा फलक गावच्या दोन्ही बाजूच्या दिशेने लावण्यात आला असल्यामुळे बाहेर गावाहून ये-जा करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अलगरवाडीच्या ग्रामस्थांनी अनेकदा ही बाब राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. त्यावर काही एक उपाययोजना करण्यात आली नाही. अलगरवाडी गावाचा फलक रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विनाकारण आठ ते दहा किमीची चक्कर...रत्नागिरी ते बोरीबुटी या राष्ट्रीय महामार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून, अलगरवाडी गावाच्या नावाचा फलक बसविण्यात आला नाही. चार लिंब पाटीही अनेक दशकांपासून आहे. त्याच्याही नावाचा फलक बसविण्यात आला नाही. त्यामुळे या अलगरवाडी गावात जाण्यासाठी प्रवासी वर्गाला हायवेवर चकरा माराव्या लागत आहेत. याकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.

टॅग्स :laturलातूरhighwayमहामार्ग