शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले ...

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले तर हमीभावातील वाढ अतिशय तोकडी आहे. त्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करून हमीभावात वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्यावतीने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. कडधान्य व तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई लक्षात घेता, दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, केंद्राने फक्त तूर आणि उडीद पिकाच्या हमीभावात ३०० रुपयांची वाढ केली आहे तर मुगासाठी गतवर्षीपेक्षा ७९ रुपयांची वाढ केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव मिळणार आहे. महागाईमुळे खत, बियाण्यांच्या झालेल्या भाववाढीमुळे ३ हजार ९५०चा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. नफा तर बाजूलाच राहिला.

मागच्या वर्षी सोयाबीनला मार्केटमध्ये उच्चांकी ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यानंतर हा भाव मिळाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. अनेक भागात प्रमुख पीक असलेल्या धानाला गतवर्षीच्या तुलनेत फक्त ७२ रुपयांची वाढ मिळाली आहे. धानाला आता प्रतिक्विंटल फक्त १ हजार ४४० रुपये भाव मिळणार आहे. जो उत्पादन खर्चाच्या कमी आहे.

कापूस उत्पादकांनाही न परवडणारा दर

कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५ हजार ५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपयांची वाढ करत ५ हजार ७२६ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. हा दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कापूस उत्पादक शेतकरी दरवर्षी कीड, नैसर्गिक आपत्तीने त्रासलेला असतो. शासनाने नव्याने हमीभाव जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली आहे.