शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

हमीभावातील वाढ तोकडी; पुनर्विचार करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले ...

लातूर : केंद्र शासनाने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात महागाईतील उत्पादन खर्च विचारात घेतले तर हमीभावातील वाढ अतिशय तोकडी आहे. त्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करून हमीभावात वाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्यावतीने केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली आहे. कडधान्य व तेलबिया उत्पादनात झालेली घट आणि वाढलेली महागाई लक्षात घेता, दोन्ही पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात मोठी वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, केंद्राने फक्त तूर आणि उडीद पिकाच्या हमीभावात ३०० रुपयांची वाढ केली आहे तर मुगासाठी गतवर्षीपेक्षा ७९ रुपयांची वाढ केली आहे. देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन असलेल्या सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपयांनी वाढ केली आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव मिळणार आहे. महागाईमुळे खत, बियाण्यांच्या झालेल्या भाववाढीमुळे ३ हजार ९५०चा सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडू शकत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. नफा तर बाजूलाच राहिला.

मागच्या वर्षी सोयाबीनला मार्केटमध्ये उच्चांकी ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. मात्र, शेतकऱ्यांजवळील सोयाबीन संपल्यानंतर हा भाव मिळाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच जास्त झाला. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. अनेक भागात प्रमुख पीक असलेल्या धानाला गतवर्षीच्या तुलनेत फक्त ७२ रुपयांची वाढ मिळाली आहे. धानाला आता प्रतिक्विंटल फक्त १ हजार ४४० रुपये भाव मिळणार आहे. जो उत्पादन खर्चाच्या कमी आहे.

कापूस उत्पादकांनाही न परवडणारा दर

कापसाला लांब धाग्यासाठी २०० रुपये वाढ देत ५ हजार ५२ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी २११ रुपयांची वाढ करत ५ हजार ७२६ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. हा दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कापूस उत्पादक शेतकरी दरवर्षी कीड, नैसर्गिक आपत्तीने त्रासलेला असतो. शासनाने नव्याने हमीभाव जाहीर करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी केली आहे.