शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हमीभाव खरेदी केंद्र नावालाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 16:59 IST

मुग उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ११०० रुपयांचा फटका

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत 

- हरी मोकाशे

लातूर : खरीपातील मुग, उडीदाच्या राशी होण्यास सुरुवात झाल्याने शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यात वेळेवर नोंदणीस सुरुवात झाली नसल्याने आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी खुल्या बाजारात शेतमालाची विक्री करीत आहेत़ मात्र, मिळणारा दर हा हमीभावाच्या तुलनेत कमी असल्याने मुग उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ११०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे़

जिल्ह्यात यंदा खरीपाच्या ६ लाख २५ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ५ लाख ४९ हजार हेक्टरवर पेरा झाला़ वेळेवर पाऊस न झाल्याने मुग आणि उडिदाच्या पेऱ्यात घट झाली़ यंदा मुगाचा पेरा केवळ ७० हजार हेक्टरवर, उडिदाचा ७६ हजार हेक्टरवर तर सोयाबीनचा ३ लाख २० हजार हेक्टरवर पेरा झाला़ दरम्यान, पिकांपुरता पाऊस आणि कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगा लगडण्याचे प्रमाण कमी झाले़ 

सध्या जिल्ह्यातील शेतकरी मुग आणि उडीदाच्या राशी करण्यात व्यस्त आहेत़ उतारा घटल्याने आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी राशी केल्यानंतर हा शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत़ दररोज बाजार समितीत मुगाची १ हजार ६८६ क्विंटलच्या जवळपास आवक होत आहे़ आधारभूत किंमत ७ हजार ५० रुपये असली तरी बाजारात सर्वसाधारण दर ५ हजार ९५० रुपये मिळत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास ११०० रुपयांचा फटका बसत आहे़ उडिदाचीही आवक जवळपास १ हजार ७५० क्विंटलपर्यंत होत आहे़ हमीभाव ५ हजार ७०० रुपये असला तरी बाजारात त्यापेक्षाही काही प्रमाणात कमी दर मिळत आहे़

शेतकरी लूट होऊ नये म्हणून शासनाने नाफेडमार्फत मुग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र, जिल्ह्यात विलंबाने म्हणजे शुक्रवारपासून आठ ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ त्यामुळे एकाही शेतकऱ्याची नोंदणी झाली नाही़

अद्याप खरेदीचे आदेश नाहीत़़़हमीभाव खरेदी केंद्रांना केवळ नोंदणीचे आदेश देण्यात आले आहेत़ खरेदी करण्याचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नाहीत़ आठ ठिकाणी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले असून एकाही शेतकऱ्याने नोंदणी केली नसल्याचे नाफेडचे प्रभारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम़एस़ लटपटे यांनी सांगितले़

एकच दिवसाचा कालावधी शिल्लक़हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे़ रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने नोंदणी होणार नाही़ त्यामुळे सोमवारचा एकच दिवस नोंदणी करण्यासाठी शिल्लक राहणार आहे़ प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कुठलेही नियोजन नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़ विशेष म्हणजे, जळकोट व देवणी येथे नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले नाही़ त्यामुळे जळकोट येथील शेतकऱ्यांना ४० किमी दूर असलेल्या उदगीरच्या केंद्रावर यावे लागणार आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती