शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

By हणमंत गायकवाड | Updated: August 31, 2023 19:51 IST

उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पंचवीस टक्के अग्रीम वितरणाच्या सूचना

लातूर : जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगाम धोक्यात आला असला तरी पर्जन्यमापकात ६० पैकी ३१ महसूल मंडळांतच २१ पेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस पडला नसल्याची नोंद आहे. तर २९ महसूल मंडळांत अधूनमधून पाऊस पडला आहे. या पावसाची नोंद पर्जन्यमापकात झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी दिली. पावसाच्या या असंतोलपणामुळे ६० महसूल मंडळांपैकी ३१ महसूल मंडळांतील पीकवाढीवर जास्त परिणाम झाला आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

खरीप हंगामातील पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पीकविमा कंपनीला २५% अग्रीम वितरणाच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आल्यास पंचवीस टक्के अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत विमा कंपन्याला कळविले जाणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र पिके धोक्यात; माना टाकल्या...२१ दिवस नव्हे महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही : एक-दोन थेंबांच्या सरी काही महसूल मंडळांत पडल्यामुळे फक्त ३१ महसूल मंडळातच दिवसांपेक्षा जास्त खंड दर्शविला जात आहे. वास्तवात जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीन माना टाकत आहेत. हलक्या जमिनीवर तर पीक पिवळे पडले आहे. मध्यम व भारी जमिनीवरील ठिकाणी थोडा तग धरला आहे. एक-दोन दिवसांत पाऊस नाही पडल्यास पिके करपणार आहेत, हे वास्तव आहे.

साठही महसूल मंडळांत सर्वेक्षण करणार...जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांमध्ये पीक परिस्थितीची पाहणी केली जात आहे. जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले जात आहे. सुरुवातीला ३१ महसूल मंडळांत. त्यानंतर उर्वरित २९ महसूल मंडळांत सर्वेक्षण होणार आहे. उत्पादनात घट आढळल्यानंतर २५% अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत पीकविमा कंपन्यांना कळविले जाईल. पर्जन्यमापकात झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार ३१ महसूल मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा खंड आहे.- एस.व्ही.लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी