शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

By हणमंत गायकवाड | Updated: August 31, 2023 19:51 IST

उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पंचवीस टक्के अग्रीम वितरणाच्या सूचना

लातूर : जिल्ह्यात सर्वत्र खरीप हंगाम धोक्यात आला असला तरी पर्जन्यमापकात ६० पैकी ३१ महसूल मंडळांतच २१ पेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस पडला नसल्याची नोंद आहे. तर २९ महसूल मंडळांत अधूनमधून पाऊस पडला आहे. या पावसाची नोंद पर्जन्यमापकात झाली असल्याची माहिती अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी दिली. पावसाच्या या असंतोलपणामुळे ६० महसूल मंडळांपैकी ३१ महसूल मंडळांतील पीकवाढीवर जास्त परिणाम झाला आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

खरीप हंगामातील पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पीकविमा कंपनीला २५% अग्रीम वितरणाच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्याअनुषंगाने कृषी विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आल्यास पंचवीस टक्के अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत विमा कंपन्याला कळविले जाणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वत्र पिके धोक्यात; माना टाकल्या...२१ दिवस नव्हे महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही : एक-दोन थेंबांच्या सरी काही महसूल मंडळांत पडल्यामुळे फक्त ३१ महसूल मंडळातच दिवसांपेक्षा जास्त खंड दर्शविला जात आहे. वास्तवात जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाचा थेंब नाही. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीन माना टाकत आहेत. हलक्या जमिनीवर तर पीक पिवळे पडले आहे. मध्यम व भारी जमिनीवरील ठिकाणी थोडा तग धरला आहे. एक-दोन दिवसांत पाऊस नाही पडल्यास पिके करपणार आहेत, हे वास्तव आहे.

साठही महसूल मंडळांत सर्वेक्षण करणार...जिल्ह्यातील साठही महसूल मंडळांमध्ये पीक परिस्थितीची पाहणी केली जात आहे. जिल्हास्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण केले जात आहे. सुरुवातीला ३१ महसूल मंडळांत. त्यानंतर उर्वरित २९ महसूल मंडळांत सर्वेक्षण होणार आहे. उत्पादनात घट आढळल्यानंतर २५% अग्रीम शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत पीकविमा कंपन्यांना कळविले जाईल. पर्जन्यमापकात झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार ३१ महसूल मंडळांत २१ दिवसांपेक्षा अधिक दिवसांचा खंड आहे.- एस.व्ही.लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर

टॅग्स :laturलातूरRainपाऊसFarmerशेतकरी