शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

समता विद्यालयात अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST

शहरातील बाजारात माठ उपलब्ध लातूर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत असून, दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यात ...

शहरातील बाजारात माठ उपलब्ध

लातूर : जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढत असून, दुपारच्या वेळी काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ बाजारात दाखल झाले असून, शहरातील गंजगोलाई, गुळ मार्केट, गांधी चौक आदी भागांत कलाकुसर केलेले माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. खरेदीला नागरिकांची पसंती दिसून येत असून, उन्हाचा पारा वाढेल तसा माठ खरेदीकडे अधिक कल वाढत जाणार आहे.

भगतसिंग विद्यालयात जयंती साजरी

लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजाभाऊ रामचंद्र राठोड यांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी आर. के. जाधव, संस्था सचिव रामदास नारायण जाधव आदींसह मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी आर. के. गायकवाड यांची इतिहास परिषदेवर निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

खाद्य तेलाचे दर वाढल्याने बजेट कोलमडले

लातूर : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. यासोबतच तूरडाळही महागली आहे. भाजीपाला स्वस्त असला तरी खाद्यतेलाला मागणी अधिक आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीन तेल १२५, सूर्यफुल १३५ ते १३८, शेंगदाणा १५५ ते १६०, तर पामतेल ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या होमआयसोलेशनमध्ये १३०हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणासाठी आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवले जाते. जिल्ह्यात दररोज एक हजारांहून अधिक व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे.

बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

लातूर : महापुरुषांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, औसा शाखेच्या वतीने औसा टी पॉईंट तेथे १७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजल्यापासून शिबिरास प्रारंभ होणार असून, रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन व्यंकटराव काकडे, नीळकंठ हेंबाडे, नरेश थोरमोटे, स्वरूपकुमार सूर्यवंशी, नंदकिशोर कांबळे, संदीप पंतोजी, महादेव गरड आदींनी केले आहे.

सॅनिटायझर स्टँड व मास्कचे वाटप

लातूर : शहरातील राही फाऊंडेशनच्या वतीने पटेल नगर येथील राजर्षी शाहू विद्यालयात ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना सॅनिटायझर स्टँड व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका पवार, जाधव, एस. व्ही. नागुरे, दीपक बजाज, शैलेश कानडे, पी. पी. झुंजे, व्ही. व्ही. कुंभार, नागेश सुगरे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन बेलुरे यांनी केले. तोडकर यांनी आभार मानले.

संविधान स्तंभ उभारण्याची मागणी

लातूर : समता, न्याय, बंधुता या तत्त्वांची विचारसरणी असणारे भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रत्येक भारतीयामध्ये रुजावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभारावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा महासचिव शीलरत्न गायकवाड यांची स्वाक्षरी आहे. या मागणीची तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अभिवादन

लातूर : तालुक्यातील मळवटी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक युवराज शिंदे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मधुकर गरड, उमाकांत धोंडजी, सुहास माकणीकर, जाफर अली सय्यद, श्रीकृष्ण पवार, विलास गिरी, मंजुषा शिंदे, चंद्रकांत चोपले, बिटाजी भोसले, सुनील आगलावे आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

अमोल स्वामी यांचा पुरस्काराने गौरव

लातूर : येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल सुनील स्वामी यांचा युवा मानकरी समाजरत्न पुरस्काराने कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. यावेळी ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज, नीळकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सभापती संजय केनेकर, अशोक स्वामी, दिलीप स्वामी, सुधीर स्वामी, अलका स्वामी, सोनाली स्वामी, अनिल सोलापुरे, नंदकुमार जंगम, विजय जंगम, वैजनाथ स्वामी, संतोष स्वामी, संजय मनूरकर आदींची उपस्थिती होती.

वीज ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा करावा

लातूर : लातूर परिमंडलात पावणेदहा लाख वीज ग्राहकांकडे ५ हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरणच्या वतीने वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वाणिज्यिक, औद्योगिक, घरगुती, कृषी पंपधारकांकडे ही थकबाकी आहे. बिलासह थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या वतीने जनजागृती मोहीमही राबविली जात आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील वीज ग्राहकांनी आपल्या थकीत वीज बिलांचा तत्काळ भरणा करावा, असे आवाहन लातूर परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.