शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

ऑनलाईन खर्च सादरीकरणाची ग्रामपंचायत उमेदवारांना चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST

लातूर : निवडणूक मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार ...

लातूर : निवडणूक मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. यंदा प्रथमच ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत उमेदवारांची चिंता वाढली आहे. ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर केल्यानंतर त्याची प्रिंट तहसीलदारांकडे सादर करावी लागणार आहे.

जिल्ह्यात ३८३ ग्रामपंचायतींच्या ३ हजार १७२ जागांसाठी निवडणूक झाली होती. जवळपास ७ हजार ५५६ उमेदवार होते. या सर्व उमेदवारांना आता ऑनलाईन खर्च सादर करावा लागणार आहे. ७ ते ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील उमेदवारांना प्रत्येकी २५ हजार, ११ ते १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतील उमेदवारांना ३५ हजार आणि १५ ते १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील उमेदवारांना प्रत्येकी ५० हजार रुपये खर्च करण्याची मुभा होती. या मर्यादेनुसार खर्च केला की त्यापेक्षा अधिक या अनुषंगाने खर्च निरीक्षकांकडून तपासणी झालेली आहे. आता त्याचा अंतिम खर्च अहवाल तहसीलदारांकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन खर्च सादर केल्यानंतरच ऑफलाईन प्रिंट देता येणार आहे. मात्र, ग्रामीण भागात नेट कनेक्टिव्हिटी आणि अन्य समस्यांमुळे अडचणी येत आहेत.

कागदपत्रे जमा केली आहेत. शपथपत्र, बाँड, खर्चाच्या पावत्या एकत्र करून दिल्या आहेत. चहा पाणी, झेराॅक्स, बॅनर पावत्या आदीबाबतच्या सर्व खर्चाची नोंद आहे. दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या प्रमाणातच तो खर्च आम्ही केलेला आहे. त्याचा हिशेब आमच्या वहीमध्ये नोंदविलेला आहे. सदर हिशेब वही तहसीलदारांकडे सादर केली जाईल. ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन केला जाईल.

-विश्वनाथ कागले, खरोळा

मोबाईल रेंजची अडचण

बहुतांश उमेदवारांकडे अँड्राॅईड मोबाईल असला तरी ग्रामीण भागात रेंजची अडचण आहे. त्यामुळे आयोगाने दिलेल्या ॲपवर खर्च सादर करणे अडचणीचे ठरत आहे. नेट कॅफेवर जाऊन ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर करावा तर तालुक्याच्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. नेट कॅफेवरही अन्य कामांची गर्दी आणि सर्व्हर कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने तासन्‌तास वेटिंग करावी लागत आहे. इकडे ३० दिवसांच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक असल्याने धावपळ होत आहे.

ट्रू-व्होटर ॲपवर खर्च सादर करून त्याची प्रिंट तहसीलदारांना उमेदवारांनी द्यावी. मोबाईल रेंज कनेक्टिव्हिटीची अडचण आणि अन्य तांत्रिक समस्या उद्‌भवत असतील तर संबंधित उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज तहसील कार्यालयात सादर करावा. मतमोजणी नुकतीच झाली आहे. ३० दिवसांचा अवधी असतो. त्यामुळे उमेदवारांच्या धावपळीचा विषय नाही. वेळ आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे. वेळेत व नियमाने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

-गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी,

सामान्य प्रशासन विभाग, लातूर