शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुसऱ्या हाताने काढून घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:10 IST

उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी आले तर त्या शेतकऱ्यानाही शंभर टक्के पीकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते.

- धर्मराज हल्लाळे  

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्टचक्र कायम आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली तरी लाभ दिला जाईल, असे शासनाने जाहीर केले. त्याच वेळी एखाद्या मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली तर पीकविम्याची संरक्षित रक्कमही २५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हातचे गेले होते आणि आता रबीचा पेराही अत्यल्प झाला. त्यामुळे ज्या मंडळात कमी पेरा झाला त्यांनाही पीकविम्याचा लाभ मिळेल, असे वाटले होते.

पूर्वी साधारणत: महसूल मंडळात १०० टक्के पेरा झाला तरच पीकविमा भरता येत होता. त्यामध्ये शिथिलता आणून शासनाने २५ टक्केपेक्षा कमी पेरा झाला तरी शेतकऱ्यांना पीकविमा भरता यावा असा निर्णय घेतला. ज्यामुळे दिलासा मिळाला असे चित्र होते. परंतु, निर्णयामागून निर्णय घेणाऱ्या यंत्रणेने पहिल्या निर्णयाला छेद देणारा दूसरा निर्णय जाहीर केला. ज्यामध्ये २५ टक्क्यांहून कमी पेरा झाला तर संरक्षित रक्कमही कमी होणार आहे. उदाहरणादाखल एखाद्या शेतकऱ्याने हरभऱ्यासाठी ३४६ रूपये पीकविमा भरला तर विम्याची संरक्षित रक्कम २३ हजार १०० रूपये मिळते. परंतु, संबंधित शेतकऱ्याच्या महसूल मंडळामध्ये रबीचा पेरा २५ टक्क्याहून कमी असेल तर त्याला संरक्षित रकमेच्या एक चतुर्थांश पैसे मिळतील. 

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात ६४ टक्के पर्जन्यमान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपाच्या उत्पादनातही सुमारे ६० टक्क्यांनी घट झाली. रबीचा तर बहुतांश ठिकाणी पेराच झाला नाही. ज्यांनी पेरा केला त्यांना काही उगवेल याची आशा नाही. जलसाठे कोरडे पडले. हिवाळ्यातच प्रकल्पांनी मृतसाठा गाठला. शेतातील विहिरी आणि बोअरची पाणी पातळीही कमालीची घटली. अनेक ठिकाणी बोअरही कोरडेठाक पडले आहेत. अशा विपरीत परिस्थितीत ज्यांनी उपलब्ध अत्यल्प पाण्यावर रबीचा पेरा केला, त्यांनाही आता पीकविम्याचा पूर्ण लाभ मिळणार नाही. हरभऱ्याच्या विमा हफ्त्याची रक्कम कमी केली. त्याचबरोबर पीक संरक्षित रक्कमही ९०० रूपयांनी घटविली. ज्यामुळे २४ हजार रूपये मिळणारा पीकविमा आता २३ हजार १०० रूपये मिळणार आहे. त्यातही तो बहुतेकांना २५ टक्केच मिळेल. 

शासनाने यंदा मंडळनिहाय पीकविमा भरण्याची सोय उपलब्ध केली. पीकविमा भरण्यासाठी ८ अ चा उतारा, संबंधित पीकाचे पेरणी प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक जोडणे आवश्यक केले. शेतकऱ्यांना सुलभ होणारे नियम केले. प्रारंभी दिलासा देणारा निर्णय घेतला अन् नंतर नव्याने नियमाने लाभावर मर्यादा आणल्या. एकंदर २५ टक्क्यांपेक्षा कमी पेरा झालेल्या भागातील एखाद्या शेतकऱ्याचेही उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी आले तर त्यांनाही शंभर टक्के पीकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती