शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद

By संदीप शिंदे | Updated: June 30, 2023 17:46 IST

पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरुच

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ व चाकुर तालुक्यास वरदान ठरलेल्या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणीलातूरला नेण्याचा घाट घालण्यात आला असून, पाइपलाइन टाकुन पाणी घेऊन जाण्याच्या कामास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला असल्याने रास्ता रोको, मोर्चा तसेच सामुहिक धरणे आंदोलन करण्यात येत असून, शुक्रवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

शिरूर अनंतपाळ आणि चाकुर तालुक्यातील ४० गावांची तहान भागविणारा तसेच शेतीसाठी वरदान ठरलेल्या घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर नेण्याचा घाट सुरु आहे. त्यासाठी १०० कोटी रूपयांची पाणी उपसा योजना मंजूर करण्यात आली असून, १२ इंच पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले असून, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीने लातूरला पाणी देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. यासाठी समितीच्या वतीने वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. कधी मोर्चा, कधी रास्ता रोको तर नियमितपणे धरणे आंदोलन या पध्दतीने आंदोलक आक्रमक होत आहेत. कोणत्याही पध्दतीने घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरला नेऊ देणार नाही असा ठाम निर्धार करण्यात आला आहे.

तात्काळ काम थांबविण्याच्या सुचना...तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील तीन दिवसांपासुन सुरू केलेले आंदोलन, धरणे, मोर्चा, रास्ता रोकोस समर्थन देण्यासाठी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन पाईपलाईनचे सुरू असलेले खोदकाम तात्काळ थांबवून अहवाल देण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान, येथील महात्मा बसवेश्वर चौकात पोलीस चौकीच्या समोर आंदोलकांनी धरणे सुरू ठेवले असून, पाचव्या दिवसी आंदोलन सुरूच आहे. गुरूवारी अन्नत्याग करण्यात आला. तर शुक्रवारी शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरagitationआंदोलन