शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे ...

अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे लागत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात २५ रुपये ५० पैसे तर व्यावसायिक गॅस ८२ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तेल, डाळींपासून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा तडका बसल्याने नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी बसावे लागले. अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागले. नंतरच्या चार-पाच महिन्यांत पुन्हा गाडी रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच दुसरी लाट सुरू झाली. या परिस्थितीमुळे सगळ्याच घटकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. असे असतानाच महागाई कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे तेल, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी अगोदरच त्रस्त असताना आता गॅसची दरवाढ करून जनतेला झटका बसला आहे. घरगुती गॅस २५ रुपये ५० पैशांनी तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. गॅसचे दर गगनाला भिडले असताना सबसिडीही अवघ्या ८ रुपयांची मिळत आहे. सद्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवरून ८५९ रुपये ५० पैसे झाला आहे. जून महिन्यात व्यावसासिक सिलिंडरची किंमत १ हजार ५३६ रुपये इतकी होती. परंतु जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ८२ रुपयांची वाढ होऊन त्याची

किंमत १ हजार ६१९ रुपये झाल्याने व्यावसायिकांचेही दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे.

दरवाढ तत्काळ मागे घ्यावी...

घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी तर व्यवसायिक गॅसच्या किमती ८२ रुपयांनी वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने गॅसची दरवाढ तत्काळ कमी करावे.

शासनाने पूर्वीप्रमाणे सबसिडी द्यावी तरच सर्वसामान्यांना गॅस वापरणे फायद्याचे राहील. वाढत्या दरामुळे ग्रामीण भागात अनेकांनी चुलीचा वापर सुरू केला आहे.- रामानंद मुंडे

खर्च कसा भागवणार तरी कसा...?

गेल्या वर्षीपासून गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गॅस सिलिंडर, तेलापासून डाळी, कडधान्ये, भाजीपाल्यापर्यंत सगळ्यांचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यावर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. पैसे नसल्याने आर्थिक चणचण असते. असेच होत राहिले तर घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - चंद्रकला आनंतवाळ