शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे ...

अहमदपूर : गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊनचा फटका सहन करत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता पुन्हा गॅस दरवाढीच्या भडक्याला सामोरे जावे लागत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात २५ रुपये ५० पैसे तर व्यावसायिक गॅस ८२ रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तेल, डाळींपासून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंना महागाईचा तडका बसल्याने नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी बसावे लागले. अनेक कुटुंबांना उपाशीपोटी राहावे लागले. नंतरच्या चार-पाच महिन्यांत पुन्हा गाडी रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच दुसरी लाट सुरू झाली. या परिस्थितीमुळे सगळ्याच घटकांचा आर्थिक स्तर खालावला आहे. असे असतानाच महागाई कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे. १ जुलैपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे तेल, डाळी, कडधान्ये अशा जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना जगण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी अगोदरच त्रस्त असताना आता गॅसची दरवाढ करून जनतेला झटका बसला आहे. घरगुती गॅस २५ रुपये ५० पैशांनी तर व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. गॅसचे दर गगनाला भिडले असताना सबसिडीही अवघ्या ८ रुपयांची मिळत आहे. सद्यस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरचा दर ८३४ रुपयांवरून ८५९ रुपये ५० पैसे झाला आहे. जून महिन्यात व्यावसासिक सिलिंडरची किंमत १ हजार ५३६ रुपये इतकी होती. परंतु जुलै महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ८२ रुपयांची वाढ होऊन त्याची

किंमत १ हजार ६१९ रुपये झाल्याने व्यावसायिकांचेही दरवाढीमुळे कंबरडे मोडले आहे.

दरवाढ तत्काळ मागे घ्यावी...

घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी तर व्यवसायिक गॅसच्या किमती ८२ रुपयांनी वाढल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने गॅसची दरवाढ तत्काळ कमी करावे.

शासनाने पूर्वीप्रमाणे सबसिडी द्यावी तरच सर्वसामान्यांना गॅस वापरणे फायद्याचे राहील. वाढत्या दरामुळे ग्रामीण भागात अनेकांनी चुलीचा वापर सुरू केला आहे.- रामानंद मुंडे

खर्च कसा भागवणार तरी कसा...?

गेल्या वर्षीपासून गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गॅस सिलिंडर, तेलापासून डाळी, कडधान्ये, भाजीपाल्यापर्यंत सगळ्यांचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यावर खर्च केल्याशिवाय पर्याय नाही. पैसे नसल्याने आर्थिक चणचण असते. असेच होत राहिले तर घरखर्च कसा भागवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. - चंद्रकला आनंतवाळ