शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना

By हणमंत गायकवाड | Updated: August 26, 2022 17:45 IST

Ganesh Mahotsav: गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना परवाना देताना किमान शंभर वृक्ष लावण्याचे मान्य करून घेण्याबरोबरच गतवर्षी लावलेल्या वृक्षांचे संगोपन केल्याचा पुरावाही घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.

लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र नगण्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मांजरा, तेरणा नदीच्या दुतर्फा वृक्ष लावण्याची मोहीम राबविली आहे. शाळा-महाविद्यालये व संस्थांचा सहभाग घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये नदीपात्राच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. आता जिल्हाभरातील गणेश मंडळांना वृक्ष लावण्याचे निर्देश दिले आहेत. गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. मंडळांना परवाना देताना तसे लिहून घेतले जात आहे. शिवाय, गतवर्षी लावलेल्या झाडांचे संगोपन केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. 

परवानगी पत्रांवर १०० वृक्षांचे रोपण करण्याची सूचना... पोलीस विभागाने गणेश मंडळांना परवाने देताना मंडळांकडून प्रत्येकी शंभर वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याची सूचना परवानगीपत्रावर नमूद करावी. तसेच दरवर्षी परवानगी देताना पूर्वी लावलेल्या किमान शंभर झाडांचे जतन केल्याचा पुरावा घ्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली आहे. वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरGanesh Mahotsavगणेशोत्सव