शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

लॉकडाऊमुळे शेतातच सडतोय फळे-भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

औराद शहाजानी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. यावर्षीही संचारबंदीमुळे शेतीमालाला बाजारपेठ भेटली नाही. परिणामी, लाखाे ...

औराद शहाजानी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. यावर्षीही संचारबंदीमुळे शेतीमालाला बाजारपेठ भेटली नाही. परिणामी, लाखाे रुपये खर्च करून पिकवलेली फळबाग व भाजीपाला शेतातच सडला आहे. बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढत्या संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू आहे. यासोबतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व तेलंगणा या शेजारील राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेचे बंधन, फळविक्री व पालेभाज्या या सर्वांची मागणी व विक्री कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पालेभाज्या व फळे शेतातच सडत आहे. गेल्या वर्षी निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला सर्व पाणी साठवण क्षेत्र भरले. परिणामी, या भागात उन्हाळी फळबागा व भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात दीड हजार हेक्टरवर भाजीपाला व एक हजार हेक्टरवर फळबाग लागवड या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी केली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात कडक लाॅकडाऊन लागल्याने शेतातील उत्पादित झालेले टरबूज, खरबूज, द्राक्ष, आंबा, पपई, आदी फळबाग तसेच मिरची, शेवगा, वांगे, टोमॅटो आदी भाजीपाला ग्राहकाअभावी शेतकऱ्यांनी शेतात तोडणी न करता सोडून दिल्याने लाखोंचा शेतीमाल शेतात पडून आहे. औरादमधील उमाकांत भंडारे यांच्या शेतातील दोन एकरामधील ८० टन टरबूज व्यापार बंद असल्यामुळे शेतातच खराब झाले आहे. डाेंगरगाव येथील युवराज बिरादार यांचेही टरबूज पिकाचे नुकसान झाले आहे.

रमजान महिन्यातही यावर्षी विक्री नाही

शेतकरी भंडारे यांनी दोन एकरमध्ये लाखो रुपये खर्च करून उत्तम दर्जाचे टरबूज उत्पादित केलेले होते. ऐन लॉकडाऊनच्या कालावधीत काढणीस आल्यामुळे या टरबुजाला मागणी नसल्याने गावात फिरून विक्री केल्यानंतरही उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे उमाकांत भंडारे यांचा टरबूज शेतातच खराब झाले. डोळ्यासमोरच शेतातील टरबूज पूर्णपणे सडून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

मिरची पिकाचेही मोठे नुकसान...

येथील युवा शेतकरी कन्हैया पाटील यांनीही एक एकरमध्ये हिरवी मिरची लागवड केली होती. आणी पीक जाेमात आले पण महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटकात व आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये लॉकडाऊन लागताच या मिरचीची मागणी थांबली. त्यामुळे ही मिरची झाडाला तशीच लागून वाळत आहे. त्याचप्रमाणे तगरखेडा येथील शेतकरी माधवराव थेटे, औराद येथील सुधाकर म्हेत्रे यांच्या शेतातील शेवगा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमालाची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. त्यामुळे शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.