शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

मध्यप्रदेशातील २० कामगारांसह सहा बालकांची मुक्तता

By आशपाक पठाण | Updated: December 16, 2022 05:14 IST

मजुरी न देता घेतले काम : भादा पोलिस ठाण्यात दोन जणांवर झाला गुन्हा दाखल

औसा  (जि. लातूर ): मध्य प्रदेशातील २० वेठबिगार कामगार व ६ बालकांकडून लातूर जिल्ह्यात विविध भागात बळजबरीने ऊसतोडणीचे काम करून घेतले जात होते. मजुरीही दिली नाही, अशी तक्रार भादा पोलिस ठाण्यात देण्यात आल्याने दोन जणांवर बंदिस्त श्रमपद्धती अधिनियम १९७६ प्रमाणे गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित मजुरांना तहसील प्रशासनाने  शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मध्यप्रदेशकडे रवाना केले. 

मध्य प्रदेश राज्यातील पनिहार येथील ३० कामगारांना राकेश नामक व्यक्तीने पुणे येथे घेऊन आला. काही महिने काम करून घेत अशोक आडे (रा. कुरणवाडी तांडा ता. अंबाजोगाई) यांना कामगारांची टोळी दिली. त्याने संबंधित कामगारांकडून जवळपास दोन महिने औसा भागात काम करून घेतले. त्यांचे पैसेही दिले नाहीत. नाराज झालेले मजूर गावी निघाले असता त्यांना जाऊही दिले नाही. यातील एकाने पळून जाऊन मध्यप्रदेशात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दिल्ली नॅशनल कॅम्पेन कमिटी फॉर इरेडिकेशन ऑफ बाँडेड लेबर या सेवा संस्थेने पाठपुरावा करून जिल्हाधिकारी लातूर व औसा उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले. संस्थेचे ॲड. अमिन खान व तक्रारदार पप्पू भाटीगोपाळ हे लातूरला आले. तद्‌नंतर औसा प्रशासनाने कामगारांना तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्यांचे जबाब घेऊन म्हणणे जाणून घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले, दुकाने निरीक्षक एन. आर. खैरनार, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, पप्पू भाटीगोपाळ याच्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात राकेश बंजारा (मध्यप्रदेश), अशोक आडे (रा. कुरणवाडी, ता. अंबाजोगाई) यांच्यावर कलम ४२०, ३४२ कामगार ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. विलास नवले करीत आहेत.  मध्यरात्री मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी  व्यवस्था करण्यात आली होती. 

आम्ही कामगारांची मुक्तता केली...मध्य प्रदेशातील मजूर होते. तिकडे तक्रार आल्याने चौकशी करण्यात आली. मजुरांना तहसील कार्यालयात आणून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २६ जणांना त्यांच्या गावी (मध्यप्रदेश) रवाना करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी सांगितले.

ही तर वेठबिगारीच... परराज्यातून प्रति १ हजार रुपये देऊन कामगारांना महाराष्ट्रात आणले गेले. त्यांना असह्य वेदना देत ऊसतोड व इतर कामे करून घेतली. त्यांची मजुरी देण्यात आली नाही. याबाबत मिळालेली माहिती व सदरची परिस्थिती पाहता हे वेठबिगारीच आहे, असे वेठबिगार(बंधुआ) मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर म्हणाले.