शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील २० कामगारांसह सहा बालकांची मुक्तता

By आशपाक पठाण | Updated: December 16, 2022 05:14 IST

मजुरी न देता घेतले काम : भादा पोलिस ठाण्यात दोन जणांवर झाला गुन्हा दाखल

औसा  (जि. लातूर ): मध्य प्रदेशातील २० वेठबिगार कामगार व ६ बालकांकडून लातूर जिल्ह्यात विविध भागात बळजबरीने ऊसतोडणीचे काम करून घेतले जात होते. मजुरीही दिली नाही, अशी तक्रार भादा पोलिस ठाण्यात देण्यात आल्याने दोन जणांवर बंदिस्त श्रमपद्धती अधिनियम १९७६ प्रमाणे गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित मजुरांना तहसील प्रशासनाने  शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मध्यप्रदेशकडे रवाना केले. 

मध्य प्रदेश राज्यातील पनिहार येथील ३० कामगारांना राकेश नामक व्यक्तीने पुणे येथे घेऊन आला. काही महिने काम करून घेत अशोक आडे (रा. कुरणवाडी तांडा ता. अंबाजोगाई) यांना कामगारांची टोळी दिली. त्याने संबंधित कामगारांकडून जवळपास दोन महिने औसा भागात काम करून घेतले. त्यांचे पैसेही दिले नाहीत. नाराज झालेले मजूर गावी निघाले असता त्यांना जाऊही दिले नाही. यातील एकाने पळून जाऊन मध्यप्रदेशात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दिल्ली नॅशनल कॅम्पेन कमिटी फॉर इरेडिकेशन ऑफ बाँडेड लेबर या सेवा संस्थेने पाठपुरावा करून जिल्हाधिकारी लातूर व औसा उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले. संस्थेचे ॲड. अमिन खान व तक्रारदार पप्पू भाटीगोपाळ हे लातूरला आले. तद्‌नंतर औसा प्रशासनाने कामगारांना तहसील कार्यालयात आणण्यात आले. त्यांचे जबाब घेऊन म्हणणे जाणून घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्यासह सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले, दुकाने निरीक्षक एन. आर. खैरनार, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांची उपस्थिती होती. 

दरम्यान, पप्पू भाटीगोपाळ याच्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात राकेश बंजारा (मध्यप्रदेश), अशोक आडे (रा. कुरणवाडी, ता. अंबाजोगाई) यांच्यावर कलम ४२०, ३४२ कामगार ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. विलास नवले करीत आहेत.  मध्यरात्री मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी  व्यवस्था करण्यात आली होती. 

आम्ही कामगारांची मुक्तता केली...मध्य प्रदेशातील मजूर होते. तिकडे तक्रार आल्याने चौकशी करण्यात आली. मजुरांना तहसील कार्यालयात आणून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २६ जणांना त्यांच्या गावी (मध्यप्रदेश) रवाना करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी सांगितले.

ही तर वेठबिगारीच... परराज्यातून प्रति १ हजार रुपये देऊन कामगारांना महाराष्ट्रात आणले गेले. त्यांना असह्य वेदना देत ऊसतोड व इतर कामे करून घेतली. त्यांची मजुरी देण्यात आली नाही. याबाबत मिळालेली माहिती व सदरची परिस्थिती पाहता हे वेठबिगारीच आहे, असे वेठबिगार(बंधुआ) मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष निंबाळकर म्हणाले.