शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

लातूर जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; पाटोदा माळहिप्परगा ओढ्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 23:54 IST

जळकोट तालुक्यातील तिरु नदी, पाटोदा (खु.), माळहिप्परगा ओढ्यावरील घटना

राजकुमार जाेंधळे, जळकोट (जि. लातूर) : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, जळकोट तालुक्यात मंगळवारी चौघेजण वाहून गेले आहेत. तिरु नदीमध्ये २८ वर्षीय तरुण तर पाटोदा (खु.) आणि माळहिप्परगा ओढ्याच्या पुलावरून जाताना ऑटो उलटला. त्यात केंद्रीय राखीव दलाची महिला पोलिस कर्मचारी व अन्य दोघे असे तिघेजण वाहून गेले.

ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. माळहिप्परगा येथून पाटोदा मार्गे उदगीरकडे ऑटो निघाला होता. वाटेत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे (वय ३५) यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अंधार असल्याने रिक्षा पाण्यात उलटली. पाण्याचा प्रवाह जोरदार होता. त्यात रिक्षातील केंद्रीय राखीव पोलिस दलाची महिला कर्मचारी सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी (वय ३२, रा. माळहिप्परगा), वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी), विठ्ठल धोंडिबा गवळे (५०, रा. पाटोदा बु.) हे तिघे वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तर रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे, बंटी उर्फ राकेश वाघमारे हे दोघेही झुडपांना धरून बचावले आहेत.

तर तिरु नदीवरून सुदर्शन घोणशेट्टे हा तरुण सकाळी १० वाजता वाहून गेला आहे. या चारही जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्यासाठी रामचंद्र पाटील, ग्रामसेवक फेरोज शेख, तलाठी आकाश पवार, सुधाकर बुके, परशुराम जानतिने, पोलिस पाटील फेरोज सिद्दीकी, धोंडिराम राठोड यांच्यासह दोन्ही गावांतील तरुण घटनास्थळी धावले आहेत. दरम्यान, तहसीलदार राजेश लांडगे, पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पथक दाखल झाले आहे. दोन्ही गावांतील पाचशेपेक्षा अधिक जमाव नदीच्या काठावर जमला आहे.

सूर्या उर्फ संगीता दिल्लीला निघाल्या होत्या...

सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी या केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवेमध्ये होत्या. त्या सुटीसाठी गावी आल्या होत्या. दरम्यान, सेवेत रूजू होण्यासाठी मंगळवारी त्या उदगीरमार्गे दिल्लीला जाणार होत्या. त्यासाठी गावातून आपल्या बहिणीच्या मुलासमवेत रिक्षाने उदगीरकडे जात होत्या. रस्त्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये रिक्षा वाहून गेली. त्यात चालकासह पाच जण होते. तिघांचा पत्ता लागला नाही. तर दोघे बचावले आहेत.

बचावकार्य वेगात, मदत पाेहचवू : माजी मंत्री बनसाेडे...

अतिवृष्टी झाली आहे. नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत आहे. अनेक पुलावरुन पाणी चालले आहे. काेणीही अनावश्यक धाडस करुन पाण्याच्या प्रवाहातून वाहने नेऊ नयेत, असे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसाेडे यांनी केले आहे. ते म्हणाले, जळकाेट तालुक्यात आतापर्यंत चार जण वाहून गेले आहेत. त्यांचे शाेधकार्य सुरु असून, संबंधितांच्या कुटुंबीयांना याेग्य ती मदत केली जाईल. शासन, प्रशासन तुमच्या साेबत आहे, असेही आ. बनसाेडे म्हणाले.

टॅग्स :riverनदी