शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

By आशपाक पठाण | Updated: August 30, 2023 19:06 IST

शेतकरी संतप्त : कमी दाबाने वीज पुरवठ्याची तक्रार

वलांडी (जि. लातूर) : गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी महावितरणकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वलांडीच्या महावितरण कार्यालयास टाळे लावले. विद्युत पुरवठा सुरळीत केल्याशिवाय टाळे काढणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभी पिके डोळ्यासमोर करपू लागली आहेत. त्यात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देवुन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हेळंब व धनेगाव या दोन गावांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युत मोटारी चालत नाहीत. शिवाय कधी तरी सुरळीत वीजपुरवठा झाला तरी काहीवेळातच पुन्हा वीज गुल होते. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरण कंपनीला कळवूनही वीज पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आता आसमानी संकटाबरोरच सुलतानी संकट ओढवले आहे.

संतप्त झालेले शेतकरी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वलांडी येथील कार्यालयात जाऊन बसले. आपल्या समस्या मांडत असताना शेतकऱ्यांची चक्क कार्यालयास टाळे ठोकले. तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, उपसरपंच सोपान शिरसे, माजी सरपंच गुणवंत सावंत, कुमार पाटील, सिध्देश्वर सावंत, महेश शिरपुरे, मनोज सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेचे सुलतानी संकट...

पावसाने हुलकावणी दिल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर जोमात आलेले सोयाबीनेच करपत आहे. त्यातच ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा हे सुलतानी संकट आहे, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.