शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण कार्यालयास टाळे

By आशपाक पठाण | Updated: August 30, 2023 19:06 IST

शेतकरी संतप्त : कमी दाबाने वीज पुरवठ्याची तक्रार

वलांडी (जि. लातूर) : गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी महावितरणकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी वलांडीच्या महावितरण कार्यालयास टाळे लावले. विद्युत पुरवठा सुरळीत केल्याशिवाय टाळे काढणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची धावपळ झाली.

मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतातील उभी पिके डोळ्यासमोर करपू लागली आहेत. त्यात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी पाणी देवुन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हेळंब व धनेगाव या दोन गावांना कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील विद्युत मोटारी चालत नाहीत. शिवाय कधी तरी सुरळीत वीजपुरवठा झाला तरी काहीवेळातच पुन्हा वीज गुल होते. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी महावितरण कंपनीला कळवूनही वीज पुरवठा सुरळीत केला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आता आसमानी संकटाबरोरच सुलतानी संकट ओढवले आहे.

संतप्त झालेले शेतकरी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वलांडी येथील कार्यालयात जाऊन बसले. आपल्या समस्या मांडत असताना शेतकऱ्यांची चक्क कार्यालयास टाळे ठोकले. तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे, उपसरपंच सोपान शिरसे, माजी सरपंच गुणवंत सावंत, कुमार पाटील, सिध्देश्वर सावंत, महेश शिरपुरे, मनोज सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेचे सुलतानी संकट...

पावसाने हुलकावणी दिल्याने सध्या शेतकरी हवालदिल झाला आहे. डोळ्यासमोर जोमात आलेले सोयाबीनेच करपत आहे. त्यातच ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. मात्र, महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी दाबाने होत असलेला विद्युत पुरवठा हे सुलतानी संकट आहे, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.