शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

आधी मतदान, नंतर चारधाम! मतदान करूनच बसेस यात्रेला धावणार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2024 01:31 IST

लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी ...

लातूर : प्रशासनाने केलेल्या मतदार जागृतीचा परिणाम सर्व स्तरामध्ये दिसून येत आहे. तीन खासगी बसेसमधून २ मे राेजी चारधामसाठी निघणाऱ्या यात्रेकरुंनी आधी मतदान करू, मगच चारधाम करू असे सांगितले. त्यामुळे यात्रा कंपनीला नियाेजन पुढे ढकलावे लागले.

लातूर लाेकसभेसाठी ७ मे राेजी मतदान हाेणार आहे. मतदानाची तारीख जाहीर हाेण्यापूर्वीच लातूर येथील एका यात्रा कंपनीने नेहमीप्रमाणे २ मे राेजी चारधामसाठी बसेस साेडण्याचे नियाेजन केले हाेते. त्यासाठी १०५ जणांनी तीन बसेससाठी प्रवास शुल्क भरले हाेते. शाळांना उन्हाळी सुटी लागली आणि २ मे पर्यंत मतदानही हाेऊन जाईल, या अपेक्षेने चारधामची यात्रा निश्चित करण्यात आली हाेती. मात्र, मतदानाची तारीख ७ मे राेजी जाहीर झाल्यानंतर चारधाम यात्रा करणाऱ्या बहुतेकांनी मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दरम्यान, प्रशासन आणि काही जागरूक यात्रेकरुंनी मतदानासाठी सर्वांचेच मन वळविले आणि मतदान करूनच चारधाम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

मतदान राष्ट्रीय कर्तव्य...यात्रा कंपनीचे श्रीराम बेंडके म्हणाले, प्रशासनाचे आवाहन आणि यात्रेकरुंच्या मागणीनुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. कंपनीलाही मतदान करणे प्रथम कर्तव्य असल्याची जाणीव असल्याने तत्पर निर्णय घेतला.

प्रत्येकाने मतदान करावे...यात्रेकरू माेहन झुंजे पाटील म्हणाले, आम्ही १०५ जण यात्रेसाठी जसे निघालाे आहाेत, तसे अनेक कंपन्या चारधामचे नियाेजन करतात. तसेच अनेकांच्या सहलीचे नियाेजन असते. परंतु, मतदान करणे आपले कर्तव्य असल्याने, सर्वांनीच सहली, धार्मिक यात्रांचे वेळापत्रक एका दिवसासाठी बदलावे अथवा मतदान करून निघावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान