शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची धास्ती वाढली; निवारणासाठी ४ कोटींचा आराखडा !

By हरी मोकाशे | Updated: October 21, 2023 18:22 IST

आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस : दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त साठा शून्य

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी ४ कोटी २९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा उशिरा आणि कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यात जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून अगदी रिमझिम, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तद्नंतर जुलै अखेरपासून पावसाने ताण दिला आहे. ऑगस्ट महिना तर जवळपास कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस झाला. कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.

आता पावसाळा संपत आला आहे. परतीच्या पावसावर अपेक्षा होती. परंतु, तीही फोल ठरली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या दोन प्रमुख नद्यांसह छोट्या नद्याही वाहिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर ओढे-नालेही खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही तर विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.

मध्यम प्रकल्पात २८ टक्के उपयुक्त पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून, त्यापैकी व्हटी आणि तिरू या दोन प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. उर्वरित सहापैकी साकोळ प्रकल्पात सर्वाधिक ६५.५८ टक्के तर तावरजा प्रकल्पात सर्वांत कमी ५.४० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. सहा प्रकल्पांमध्ये २८.३२ टक्के उपयुक्त पाणी आहे. तसेच लघु पाटबंधारेच्या १३४ तलावांमध्ये ८७.९८४ दलघमी म्हणजे २८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

नळयोजना दुरुस्तीवर विशेष भर...पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई उद्भवू शकते, असा अंदाज वर्तवित जिल्हा प्रशासनाने ४ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. त्यात नळयोजना विशेष दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी २२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होईल, असे गृहित धरण्यात आले आहे. टँकरसाठी ५ लाख ४० हजार, विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी १५ लाख ५६ हजार, विंधन विहिरींसाठी ५९ लाख, तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी २५ लाख २० हजार तर विहिरीतील गाळ काढण्यासाठी २ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात...तालुका - सरासरी पाऊस मिमीमध्येलातूर - ५३९.४औसा - ४६४.९अहमदपूर - ५२२.६निलंगा - ५२७.८उदगीर - ६८९.३चाकूर - ४८०.६रेणापूर - ४६६.१देवणी - ६९९.४शिरुर अनं. - ५२४.४जळकोट - ५२६.९एकूण - ५४०.०

व्हटी, तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली...प्रकल्प - उपयुक्त जलसाठा (दलघमी)तावरजा - १.०९९व्हटी - जोत्याखालीरेणापूर - ४.९४६तिरू - जोत्याखालीदेवर्जन - ४.५२९साकोळ - ७.१८०घरणी - ८.५९७मसलगा - ८.२४४एकूण - ३४.५९५ 

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणRainपाऊसFarmerशेतकरी