शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची धास्ती वाढली; निवारणासाठी ४ कोटींचा आराखडा !

By हरी मोकाशे | Updated: October 21, 2023 18:22 IST

आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस : दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त साठा शून्य

लातूर : यंदाच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने पाणीटंचाईची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणासाठी ४ कोटी २९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या दोन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत यंदा उशिरा आणि कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्याचप्रमाणे जिल्ह्यात जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासून अगदी रिमझिम, मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तद्नंतर जुलै अखेरपासून पावसाने ताण दिला आहे. ऑगस्ट महिना तर जवळपास कोरडा गेला. सप्टेंबरमध्ये थोडाफार पाऊस झाला. कमी पर्जन्यमान झाल्याने खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली.

आता पावसाळा संपत आला आहे. परतीच्या पावसावर अपेक्षा होती. परंतु, तीही फोल ठरली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या दोन प्रमुख नद्यांसह छोट्या नद्याही वाहिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर ओढे-नालेही खळखळले नाहीत. त्यामुळे मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही तर विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.

मध्यम प्रकल्पात २८ टक्के उपयुक्त पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प असून, त्यापैकी व्हटी आणि तिरू या दोन प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. उर्वरित सहापैकी साकोळ प्रकल्पात सर्वाधिक ६५.५८ टक्के तर तावरजा प्रकल्पात सर्वांत कमी ५.४० टक्के उपयुक्त जलसाठा आहे. सहा प्रकल्पांमध्ये २८.३२ टक्के उपयुक्त पाणी आहे. तसेच लघु पाटबंधारेच्या १३४ तलावांमध्ये ८७.९८४ दलघमी म्हणजे २८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

नळयोजना दुरुस्तीवर विशेष भर...पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाई उद्भवू शकते, असा अंदाज वर्तवित जिल्हा प्रशासनाने ४ कोटी २९ लाख ८६ हजार रुपयांचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. त्यात नळयोजना विशेष दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी २२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होईल, असे गृहित धरण्यात आले आहे. टँकरसाठी ५ लाख ४० हजार, विहिरी अधिग्रहणासाठी १ कोटी १५ लाख ५६ हजार, विंधन विहिरींसाठी ५९ लाख, तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी २५ लाख २० हजार तर विहिरीतील गाळ काढण्यासाठी २ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात...तालुका - सरासरी पाऊस मिमीमध्येलातूर - ५३९.४औसा - ४६४.९अहमदपूर - ५२२.६निलंगा - ५२७.८उदगीर - ६८९.३चाकूर - ४८०.६रेणापूर - ४६६.१देवणी - ६९९.४शिरुर अनं. - ५२४.४जळकोट - ५२६.९एकूण - ५४०.०

व्हटी, तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली...प्रकल्प - उपयुक्त जलसाठा (दलघमी)तावरजा - १.०९९व्हटी - जोत्याखालीरेणापूर - ४.९४६तिरू - जोत्याखालीदेवर्जन - ४.५२९साकोळ - ७.१८०घरणी - ८.५९७मसलगा - ८.२४४एकूण - ३४.५९५ 

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरणRainपाऊसFarmerशेतकरी