शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पाण्याअभावी ऊस वाळण्याची भिती, गुऱ्हाळाकडे वळली शेतकऱ्यांची पाऊले

By संदीप शिंदे | Updated: January 13, 2024 17:13 IST

यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे.

हाळी हंडरगुळी (लातूर) : परिसरातील काही शेतकऱ्यांचा कल गुळ उत्पादनाकडे पूर्वीपासूनच आहे. यंदाच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने ऊस वाळण्याच्या भितीपोटी शेतकरी गूळ गाळपाकडे वळत असल्याचे चित्र आहे.

हाळी हंडरगुळी गावांसह परिसरातील चिमाचीवाडी, मोरतळवाडी, आडोळवाडी, सुकणी, वाढवणा बु., वाढवणा खु., शिवणखेड, कुमठा, वडगाव, वायगाव आदी शिवारात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र यंदा पावसाचे कमी प्रमाण झाल्याने ऐन शेवटच्या टप्प्यात ऊसाला पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे जेवढे लवकर असेल तेवढ्या लवकर ऊस शेतातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील विकास सहकारी साखर कारखाना युनिट-२ व शेजारील तालुक्यातील बालाघाट शेतकरी साखर कारखाना यांचे गाळप सुरु असल्याने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी धावपळ करत आहेत. परंतु तारखेची मुदत संपण्याच्या आतील ऊस कारखाना नेत नसल्याने तसेच ६७१, ८६०३२ या जातीच्या ऊसाला कारखाना प्राधान्य देत असल्याने व पाण्याअभावी ऊस वाळेल या भितीपोटी काही शेतकऱ्यांची मानसिकता गुऱ्हाळाकडे वळली आहे. सध्या हाळी हंडरगुळी परिसरात जवळपास १५ ते २० ठिकाणी गु्ऱ्हाळे सुरु आहेत. सध्या गुळाला प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये भाव आहे.

गुऱ्हाळ चालविणे झाले जिकरीचे...पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण, मजुरांची टंचाई, खते व औषधांच्या वाढलेल्या किंमती यामुळे गुऱ्हाळे चालवणे अवघड झाले असल्याचे चिमाचीवाडी येथील रामराव गुणाले यांनी सांगितले. तर दरवर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन होते. मात्र गुळ साठवण्यासाठी या परिसरात वेअर हाऊस नसल्याने गुळाची साठवण करुन ठेवता येत नाही. त्यामुळे व्यापारी बेभावाने गुळ खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाकडे वेअर हाऊस उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचे दयानंद गुद्दे यांनी सांगीतले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर