शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:19 IST

उन्ह वाढले तरी... यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे मे महिन्यात काय ...

उन्ह वाढले तरी...

यंदा एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे मे महिन्यात काय होणार अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. कारण या कालावधीत मनरेगाची कामे सुरु असतात. यासाठी ग्रामीण भागातील मजूर वर्ग रोजगारासाठी बाहेर जात असतो. दिवसभर उन्ह अंगावर घेवून काम करतो. मात्र यंदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने ही सर्व कामे बंद असल्याने वाढत्या तापमानाचा फारसा परिणाम झाला नाही.

उष्माघाताने एकही मृत्यू नाही...

कोरोनामुळे उन्हाळा घरातच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता ब्रेक द चेन अंतर्गत मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे उद्योगधंदे व सर्वच व्यवहार ठप्प आहे. तर नागरिकांना बाहेर फिरण्यास निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणेच यंदाचा उन्हाळा देखील जिल्हावासीयांना घरात घालवावा लागला आहे. त्यामुळे ना उन्हाची समस्या व उष्माघाताचा त्रास झाला नाही. तर यंदा अवकाळी पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने मे महिन्यात सुध्दा तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होते.

तीन वर्षातील उष्माघाताचे बळी

२०१९ - ००

२०२० - ००

२०२१ - ००

गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात उष्माघाताने एकही मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर याबाबत उष्माघात तसेच इतर साथरोगासाठी योग्य त्या सुचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील वर्षी आणि या वर्षी उन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने अनेक कामे बंद होती. त्यामुळे मजूर, कामगार बाहेर पडलेले नाहीत. - डॉ. श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य विभाग, लातूर