शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शेतकरीच ठरणार सोयाबीन बियाणे उत्पादक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून २० हजार, विविध खासगी कंपन्यांकडून ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. दरम्यान, शेतकऱ्यांकडे पावणेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्याचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना स्वत:जवळील बियाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे बळीराजाच सोयाबीन बियाणे उत्पादक बनणार आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९३ हजार हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ तूर ९० हजार हेक्टर, मूग ११ हजार, उडीद ९ हजार, ज्वारीचा १७ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित आहे. गेल्यावर्षी निकृष्ट बियाणे, अधिक पावसामुळे सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे आगामी खरिपासाठी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवणार, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने गावोगावी जनजागृती करुन बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

खरिपासाठी जिल्ह्याला ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून केवळ २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यातील ४ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे. उर्वरित १६ हजार क्विंटलमधील बियाणे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तर हे बियाणे विक्री झाल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. विविध खासगी कंपन्यांचे ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांकडे ३ लाख ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गावातील शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बियाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

बियाण्याच्या पोत्यामागे एक हजाराचा फरक...

‘महाबीज’चे बियाणे हे भरवशाचे गृहित धरले जाते. त्यातच महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या एका पोत्यामागे जवळपास एक हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील उगवण क्षमता चांगल्या असलेल्या शेतकऱ्यांजवळील बियाणे वापरणे गरजेचे ठरत आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा...

एकदा सुधारित सोयाबीन बियाणे वापरल्यानंतर आलेल्या उत्पन्नातून पुढील तीन वर्षे तेच बियाणे वापरता येते. महाबीज बियाण्याला अधिक मागणी आहे. परंतु, ते यंदा कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपनीकडील बियाणे वापरल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

घरचे बियाणे वापरावे...

शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याऐवजी आपल्या गावातील शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा. त्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी. त्यामुळे बियाणे न उगवण्याची भीती राहणार नाही. कमी दरात चांगले बियाणे मिळेल. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून जनजागृती करुन प्रबोधन केले जात आहे.

- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.