शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच ठरणार सोयाबीन बियाणे उत्पादक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असून, ३ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून २० हजार, विविध खासगी कंपन्यांकडून ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. दरम्यान, शेतकऱ्यांकडे पावणेचार लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या बियाण्याचा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना स्वत:जवळील बियाण्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे बळीराजाच सोयाबीन बियाणे उत्पादक बनणार आहे.

जिल्ह्यात यंदा खरिपाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ९३ हजार हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होणार असून, ४ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यापाठोपाठ तूर ९० हजार हेक्टर, मूग ११ हजार, उडीद ९ हजार, ज्वारीचा १७ हजार हेक्टरवर पेरा अपेक्षित आहे. गेल्यावर्षी निकृष्ट बियाणे, अधिक पावसामुळे सोयाबीनला फटका बसला. त्यामुळे आगामी खरिपासाठी सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा जाणवणार, हे लक्षात घेऊन कृषी विभागाने गावोगावी जनजागृती करुन बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

खरिपासाठी जिल्ह्याला ३ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवश्यकता आहे. ‘महाबीज’कडून केवळ २० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यातील ४ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे. उर्वरित १६ हजार क्विंटलमधील बियाणे मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तर हे बियाणे विक्री झाल्याचा कृषी विभागाचा दावा आहे. विविध खासगी कंपन्यांचे ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तसेच कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकऱ्यांकडे ३ लाख ७५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता गावातील शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बियाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

बियाण्याच्या पोत्यामागे एक हजाराचा फरक...

‘महाबीज’चे बियाणे हे भरवशाचे गृहित धरले जाते. त्यातच महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या बियाण्याच्या एका पोत्यामागे जवळपास एक हजार रुपयांचा फरक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गावातील उगवण क्षमता चांगल्या असलेल्या शेतकऱ्यांजवळील बियाणे वापरणे गरजेचे ठरत आहे. त्यातून दोन्ही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा...

एकदा सुधारित सोयाबीन बियाणे वापरल्यानंतर आलेल्या उत्पन्नातून पुढील तीन वर्षे तेच बियाणे वापरता येते. महाबीज बियाण्याला अधिक मागणी आहे. परंतु, ते यंदा कमी प्रमाणात उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून शेतकरी अथवा शेतकरी उत्पादक कंपनीकडील बियाणे वापरल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

घरचे बियाणे वापरावे...

शेतकऱ्यांनी खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याऐवजी आपल्या गावातील शेतकऱ्यांकडील बियाण्याचा वापर करावा. त्यापूर्वी उगवण क्षमता तपासावी. त्यामुळे बियाणे न उगवण्याची भीती राहणार नाही. कमी दरात चांगले बियाणे मिळेल. त्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून जनजागृती करुन प्रबोधन केले जात आहे.

- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.