शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

खांद्यावर नांगर घेऊन शेतकरी पायी मुंबईकडे; प्रत्येकाने जू खांद्यावर घ्यायचा का ? शेतकरी होनाळे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 03:40 IST

व्यथा सरकार दरबारी मांडायच्या तर प्रत्येकाने खांद्यावर जू घ्यायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे...

 

अहमदपूर (जि. लातूर) : हडोळतीच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने बैलजोडी परवडेना म्हणून स्वत:ला औताला जुंपले, ही वार्ता ऐकून अस्वस्थ झालेले अहमदपूर तालुक्यातीलच धानोऱ्याचे शेतकरी सहदेव होनाळे यांनी नांगर हाती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याचा शुक्रवारी निर्धार केला आहे.

व्यथा सरकार दरबारी मांडायच्या तर प्रत्येकाने खांद्यावर जू घ्यायचा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांचा मुलगा ओमकार याच्याशी संपर्क केला असता तो म्हणाला, वडिलांनी मुंबईला जायचे आहे, असे सांगितले होते. तत्पूर्वी खांद्यावर जू घेतलेल्या शेतकऱ्याच्या बातमीनंतर ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याची अशीच कहाणी आहे. पाऊस नाही पडला तर धो- धो पडतो. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याची शेती कधी पिकलीच तर शेतमालाला भाव मिळत नाही. या सर्व अडचणी मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आहे. ते गाऱ्हाणे ऐकतील, अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. त्यांना तीन भावांमध्ये साडेनऊ एकर जमीन आहे, असे त्यांच्या मुलाने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार