शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे

By संदीप शिंदे | Updated: August 26, 2023 16:50 IST

पिकांना फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत.

औराद शहाजानी : परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली असून, शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. पाऊस पडावा, दुष्काळाचे सावट दुर करावे, यासाठी तगरखेडा येथील शेतकऱ्यांनी शनिवारी पायी चालत परिसरातील ११ मारुती मंदिरात पाणी घालून पावसासाठी साकडे घातले.

औराद शहाजानीसह परिसरातील गावांमध्ये महिनाभरापासून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत. फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी तगरखेडा येथील शेतकऱ्यांनी टाळ-मृदंगांच्या गजरात भजन गात तगरखेडा, सावरी, चन्नाचीवाडी, संगारेड्डीवाडी, काेयाजीवाडी, माकणी, माने जवळगा, जिरबवाडी, शिरसी, राजेवाडी, हलगरा या गावातील मारुती मंदिरात पायी पायी जाऊन मारोती रायाला पाणी घालून पावसासाठी साकडे घातले. यावेळी मनाेज स्वामी, किशन बिरादार, विठ्ठल बिरादार, दिगंबर बिरादार, अशाेक पांचाळ, संतोष मुळजे, राजेंद्र पाटील, बाबुराव बाकारे, नामदेव बिरादार, सुरेश बिरादार, शिवाजी बिरादार, महादेव बिरादार, शेषराव बिरादार, श्रीहरी बिरादार, अशाेक बिरादार, दत्ता बिरादार आदींसह ग्रामस्थांचा सहभाग होता.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीRainपाऊस