शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी

By हरी मोकाशे | Updated: September 23, 2022 17:46 IST

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळात अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर खराब झालेल्या सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.

किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नवनाथ गाडे, अनंत बरुरे, महादेव बरुरे, लहू गाडे, विजय आरदवाड, हबीब शेख, अजय दाडगे, अविनाश पाटील, राजकुमार हारडे, प्रकाश साबदे, रामकिसन सोमवंशी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

रेणापूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शिवाय, मागील एक-दीड महिन्यापासून सतत पाऊस झाला. कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या सोयाबीनला फटका बसला. काही ठिकाणच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे जवळपास ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत म्हणून किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.

मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनची होळी करून संताप व्यक्त केला. शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी