शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी

By हरी मोकाशे | Updated: September 23, 2022 17:46 IST

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी

रेणापूर (जि. लातूर) : तालुक्यातील कारेपूर महसूल मंडळात अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर खराब झालेल्या सोयाबीनची होळी करण्यात आली. यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले.

किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नवनाथ गाडे, अनंत बरुरे, महादेव बरुरे, लहू गाडे, विजय आरदवाड, हबीब शेख, अजय दाडगे, अविनाश पाटील, राजकुमार हारडे, प्रकाश साबदे, रामकिसन सोमवंशी यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

रेणापूर तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोगलगायींचा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान झाले. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. शिवाय, मागील एक-दीड महिन्यापासून सतत पाऊस झाला. कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या सोयाबीनला फटका बसला. काही ठिकाणच्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे कारेपूर मंडळातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे जवळपास ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत म्हणून किसान सेनेचे अध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले होते.

मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनची होळी करून संताप व्यक्त केला. शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी