शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वीजबिल वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST

लातूर : महावितरणकडून सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेकडून औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे महावितरण ...

लातूर : महावितरणकडून सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेकडून औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला स्थानबद्ध करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवला नाही तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेकडून देण्यात आला. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच महावितरण कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली केली जात आहे. घरगुती आणि शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. यामुळे पाणी असूनही ते शेतीला देता येत नाही. महावितरण कंपनीच्या या मनमानीविरोधात शेतकरी संघटनेकडून वीजबिल वसुलीसाठी गावात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हिप्परसोगा येथे आलेल्या लोदगा शाखेच्या कनिष्ठ अभियंत्यांना शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख मदन सोमवंशी, माधवराव मल्लेशे, बालाजी जाधव, बालाजी सोमवंशी, मंगलबाई सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके उपस्थित होते. महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम तत्काळ थांबवावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.