शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली

By संदीप शिंदे | Updated: August 25, 2023 18:08 IST

पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी

किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अहमदपूर तालुक्यात पावसाअभावी पेरण्या उशिरा झाल्या. रिमझिम पावसावरच पिकांनी तग धरला. मात्र, मागील २५ दिवसांपासून किनगाव परिसरात पाऊस नसल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

किनगाव महसूल मंडळात एकूण भौगोलिक क्षेत्र १५ हजार ८०३ हेक्टर असून, १४ हजार २४९ पेरणीयोग्य क्षेत्र आहे. या खरीप हंगामामध्ये तृणधान्य २३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तूर १ हजार ८८४, मूग १०१, उडीद ३० व इतर २०१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच सोयाबीनची १० हजार ६९२, कापूस ७७ हेक्टरवर आहे. किनगाव महसूल मंडळामध्ये १३ हजार ७५ हेक्टरवर पेरणी झाली असून एकूण ९७.६१ टक्के पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे उसनवारी करून, प्रसंगी कर्ज काढून शेतात पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या पंचवीस दिवसापासून उघडीप दिल्याने पिके वाळू लागली आहेत. शासनाने तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अहमदपूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर व्यंकट कुलकर्णी, श्रीराम श्रृंगारे, अशोक बनसोडे, काशीनाथ बुचडे, दिनकर मुंढे आदींसह शेतकऱ्यांच्या नावे आहेत.

मागील २५ दिवसांपासून पावसाची उघडीप...किनगाव परिसरात मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, त्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढलेला असून, पावसाचा खंड या नियमानुसार अग्रीम पिकविमा तसेच पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. परिसरात दमदार पाऊस झालेला नसल्याने नदी, नाले काेरडेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर