शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली

By संदीप शिंदे | Updated: August 25, 2023 18:08 IST

पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी

किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अहमदपूर तालुक्यात पावसाअभावी पेरण्या उशिरा झाल्या. रिमझिम पावसावरच पिकांनी तग धरला. मात्र, मागील २५ दिवसांपासून किनगाव परिसरात पाऊस नसल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

किनगाव महसूल मंडळात एकूण भौगोलिक क्षेत्र १५ हजार ८०३ हेक्टर असून, १४ हजार २४९ पेरणीयोग्य क्षेत्र आहे. या खरीप हंगामामध्ये तृणधान्य २३२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर तूर १ हजार ८८४, मूग १०१, उडीद ३० व इतर २०१७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच सोयाबीनची १० हजार ६९२, कापूस ७७ हेक्टरवर आहे. किनगाव महसूल मंडळामध्ये १३ हजार ७५ हेक्टरवर पेरणी झाली असून एकूण ९७.६१ टक्के पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे उसनवारी करून, प्रसंगी कर्ज काढून शेतात पेरणी केली आहे. मात्र, पावसाने गेल्या पंचवीस दिवसापासून उघडीप दिल्याने पिके वाळू लागली आहेत. शासनाने तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व भरपाई देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अहमदपूर तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर व्यंकट कुलकर्णी, श्रीराम श्रृंगारे, अशोक बनसोडे, काशीनाथ बुचडे, दिनकर मुंढे आदींसह शेतकऱ्यांच्या नावे आहेत.

मागील २५ दिवसांपासून पावसाची उघडीप...किनगाव परिसरात मागील २५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते स्प्रिंकलरद्वारे पिकांना पाणी देत आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाही, त्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढलेला असून, पावसाचा खंड या नियमानुसार अग्रीम पिकविमा तसेच पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले आहे. परिसरात दमदार पाऊस झालेला नसल्याने नदी, नाले काेरडेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर