शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:14 IST

कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले

उजनी (लातूर) : कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी धिरु राठोड (४२) यांना ६० हजार रुपयांचे कृषी पंपाचे वीजबिल आले आहे. सदर बिल कमी करून द्यावे म्हणून त्यांनी उजनी येथील महावितरण कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र संबंधित अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाजी राठोड पुन्हा मंगळवारी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आले. मला वीजबिल कमी करून दिले नाही, अनेकवेळा मागणी केली तरी ते कमी केले जात नाही, असे म्हणत विषारी द्रव असलेली बाटली काढून द्रव प्राशन केले. यावेळी महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, एकंबी तांडा येथील सरपंच शिवराज राठोड यांनी त्यांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बेलकुंड येथील पोलीस चौकीचे अंमलदार एन.टी. कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सदर शेतकºयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सरपंच शिवराज राठोड यांनी सांगितले. उजनी येथील महावितरणचे शाखा अभियंता किरण क्षीरसागर म्हणाले, मंगळवारी मी कार्यालयात नव्हतो. कामानिमित्त आशिवला होतो. विषारी द्रव कोणत्या शेतकºयाने घेतले याची माहिती आपणाला नाही. शिवाय, आपल्याकडे बिलासंदर्भात कसलीही तक्रार आलेली नाही. ज्या शेतकºयांचे जास्त बिल आहे, त्यांना आपण हप्ते पाडून देतच असतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या