शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:14 IST

कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले

उजनी (लातूर) : कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी धिरु राठोड (४२) यांना ६० हजार रुपयांचे कृषी पंपाचे वीजबिल आले आहे. सदर बिल कमी करून द्यावे म्हणून त्यांनी उजनी येथील महावितरण कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र संबंधित अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाजी राठोड पुन्हा मंगळवारी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आले. मला वीजबिल कमी करून दिले नाही, अनेकवेळा मागणी केली तरी ते कमी केले जात नाही, असे म्हणत विषारी द्रव असलेली बाटली काढून द्रव प्राशन केले. यावेळी महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, एकंबी तांडा येथील सरपंच शिवराज राठोड यांनी त्यांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बेलकुंड येथील पोलीस चौकीचे अंमलदार एन.टी. कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सदर शेतकºयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सरपंच शिवराज राठोड यांनी सांगितले. उजनी येथील महावितरणचे शाखा अभियंता किरण क्षीरसागर म्हणाले, मंगळवारी मी कार्यालयात नव्हतो. कामानिमित्त आशिवला होतो. विषारी द्रव कोणत्या शेतकºयाने घेतले याची माहिती आपणाला नाही. शिवाय, आपल्याकडे बिलासंदर्भात कसलीही तक्रार आलेली नाही. ज्या शेतकºयांचे जास्त बिल आहे, त्यांना आपण हप्ते पाडून देतच असतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्या