शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

By संदीप शिंदे | Updated: December 16, 2022 16:43 IST

५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत

- संदीप शिंदेलातूर : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढलेला डोंगर, नापिकीसह विविध कारणांमुळे गेल्या वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नाेंद शासनदरबारी आहे. यापैकी ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. दरम्यान, शासनस्तरावरून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कागदोपत्रीच उपायोजना होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्ह्यात जानेवारीमध्ये ५, फेब्रुवारी ४, मार्च ८, एप्रिल ४, मे ६, जून ५, जुलै २२, ऑगस्ट ५, सप्टेंबर ९, ऑक्टोबर २, नोव्हेंबर ७ तर डिसेंबर महिन्यात २ अशा एकूण ६१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. दरम्यान, यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडणार, या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सरकारी उपाययोजना कागदावरच...शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत आहे. पीककर्ज वाटप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत, शासकीय योजनांचा थेट लाभ आदींची अंमलबजावणीही योग्यरीतीने केल्यास आत्महत्येस प्रतिबंध करता येणार आहे.

आत्महत्येची ही आहेत कारणे...शेतमालाला जाहीर केलेला आधारभूत किंमत कधीच मिळत नाही. परिणामी, पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य खर्च, लग्न, उदरनिर्वाह, बँकेचे कर्ज कसे फेडणार ? या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या होत आहेत.

५ अपात्र तर ५ प्रस्ताव प्रलंबित...वर्षभरात ६१ शेतकरी आत्महत्या समोर आल्या आहेत. यातील ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली आहे. तर ५ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्ज, कुटुंबाचा गाडा कसा हाकणार ? या विंवचनेतून याच महिन्यात सर्वाधिक ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ८ कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.

वर्षभरातील महिनानिहाय शेतकरी आत्महत्या...जानेवारी - ०५फेब्रुवारी - ०४मार्च - ०८एप्रिल - ०४मे - ०६जून - ०५जुलै - ०४ऑगस्ट - ०५सप्टेंबर - ०९ऑक्टोबर - ०२नोव्हेंबर - ०७डिसेंबर - ०२एकूण ६१

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीlaturलातूर