शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; लातुर जिल्ह्यात वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी संपविले जीवन!

By संदीप शिंदे | Updated: December 16, 2022 16:43 IST

५१ कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली असून ५ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत

- संदीप शिंदेलातूर : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, कर्जाचा वाढलेला डोंगर, नापिकीसह विविध कारणांमुळे गेल्या वर्षभरात ६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नाेंद शासनदरबारी आहे. यापैकी ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. दरम्यान, शासनस्तरावरून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ कागदोपत्रीच उपायोजना होत असल्याने शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्ह्यात जानेवारीमध्ये ५, फेब्रुवारी ४, मार्च ८, एप्रिल ४, मे ६, जून ५, जुलै २२, ऑगस्ट ५, सप्टेंबर ९, ऑक्टोबर २, नोव्हेंबर ७ तर डिसेंबर महिन्यात २ अशा एकूण ६१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. दरम्यान, यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडणार, या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सरकारी उपाययोजना कागदावरच...शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी त्याची अंमलबजावणी केवळ कागदावरच होत आहे. पीककर्ज वाटप, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत, शासकीय योजनांचा थेट लाभ आदींची अंमलबजावणीही योग्यरीतीने केल्यास आत्महत्येस प्रतिबंध करता येणार आहे.

आत्महत्येची ही आहेत कारणे...शेतमालाला जाहीर केलेला आधारभूत किंमत कधीच मिळत नाही. परिणामी, पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण, आरोग्य खर्च, लग्न, उदरनिर्वाह, बँकेचे कर्ज कसे फेडणार ? या विवंचनेतून शेतकरी आत्महत्या होत आहेत.

५ अपात्र तर ५ प्रस्ताव प्रलंबित...वर्षभरात ६१ शेतकरी आत्महत्या समोर आल्या आहेत. यातील ५१ कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली आहे. तर ५ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले असून, ५ प्रस्ताव चौकशीकरिता प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतशिवारात पाणी साचल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्ज, कुटुंबाचा गाडा कसा हाकणार ? या विंवचनेतून याच महिन्यात सर्वाधिक ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यापैकी ८ कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.

वर्षभरातील महिनानिहाय शेतकरी आत्महत्या...जानेवारी - ०५फेब्रुवारी - ०४मार्च - ०८एप्रिल - ०४मे - ०६जून - ०५जुलै - ०४ऑगस्ट - ०५सप्टेंबर - ०९ऑक्टोबर - ०२नोव्हेंबर - ०७डिसेंबर - ०२एकूण ६१

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीlaturलातूर